...म्हणून राष्ट्रपतींचा हिमाचल दौरा रद्द

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हिमाचल प्रदेशचा दौरा रद्द झाला आहे. राष्ट्रपती ५ ते ९ मे दरम्यान त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर येणार होत्या. पण हा दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केले आहे.



भारत - पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त आले आहे. याआधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाच मे रोजी सिमला येथे पोहोचणार होत्या. पण आता राष्ट्रपतींचा पूर्ण हिमाचल दौरा रद्द झाला आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा पाहणी झाली होती. पण गुप्तचर यंत्रणेच्या ताज्या अहवालामुळे राष्ट्रपतींचा हिमाचल दौरा रद्द करण्यात आला आहे. आता राष्ट्रपती हिमाचल प्रदेशचा दौरा कधी करणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

भारत - पाकिस्तान तणाव

पाकिस्तानने सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला. भारताकडून सलग सातव्या रात्री पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.
Comments
Add Comment

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या