...म्हणून राष्ट्रपतींचा हिमाचल दौरा रद्द

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हिमाचल प्रदेशचा दौरा रद्द झाला आहे. राष्ट्रपती ५ ते ९ मे दरम्यान त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर येणार होत्या. पण हा दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केले आहे.



भारत - पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त आले आहे. याआधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाच मे रोजी सिमला येथे पोहोचणार होत्या. पण आता राष्ट्रपतींचा पूर्ण हिमाचल दौरा रद्द झाला आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा पाहणी झाली होती. पण गुप्तचर यंत्रणेच्या ताज्या अहवालामुळे राष्ट्रपतींचा हिमाचल दौरा रद्द करण्यात आला आहे. आता राष्ट्रपती हिमाचल प्रदेशचा दौरा कधी करणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

भारत - पाकिस्तान तणाव

पाकिस्तानने सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला. भारताकडून सलग सातव्या रात्री पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.
Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला