

Pahalgam Attack : राष्ट्रीय सुरक्षा मंडळात महत्त्वाचा बदल; माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी नियुक्ती
नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. या तणावपूर्ण वातावरणानंतर केंद्र ...
पाकिस्तानने सातव्या रात्री म्हणजेच बुधवार - गुरुवार दरम्यान रात्री कुपवाडा, उरी आणि अखनूरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. हलक्या शस्त्रांद्वारे पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता. भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.
भारत - पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असल्यामुळे दररोज कित्येक तास स्थानिकांना बंकरमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारी योजनेत सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये दर्जेदार बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये नागरिक सुरक्षित आहेत.