फोन चार्जिंगला लावून वापरत असाल मग ही बातमी वाचा

अमरावती : मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो. जगभरात अचानक फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, हे स्फोट प्राणघातक देखील ठरले आहेत. चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची घटनाअनेकदा घडली आहे. अशीच एक घटना अमरावती येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.


अमरावतीतील साईधामनगर येथील संजय टाले यांचा घरी ही घटना सकाळी ११ वाजता घडली. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज व आवाका एवढा मोठा होता की संपुर्ण घरात कंपन झाले होते. स्फोटाच्या आवाजाने संजय टाले यांची पत्नी हॉलमध्ये आल्या असता मोबाईला आग लागलेलीत्यांना दिसली तसेच बाजूच्या कपड्यांनीसुद्धा पेट घेतला होता. त्यांनी प्लगचे बटन स्वीचऑफ केले व मोबाईलवर पाणी टाकले. सतर्कतेने मोठी हानी टळली. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये सुदैवाने कोणी नव्हते. संजय टाले यांनी सांगीतले की, मोबाईलच्या स्फोटाचा आवाज खुप मोठा होता.


घर थोडक्यात बचावले. पत्नीने जर तात्काळ येऊन मोबाईलची आग विझवली नसती तर खूप मोठी हानी झाली असती.मोबाईल स्फोट कसा होतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. कुणीही चार्जिंगवर लावून मोबाईल पाहू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये. नाहीतर खूप मोठी नुकसान होऊ शकते, असे संजय टाले यांनी सांगितले

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी