फोन चार्जिंगला लावून वापरत असाल मग ही बातमी वाचा

अमरावती : मोबाईल फोन काळजीपूर्वक हाताळला नाही तर तो धोकादायक ठरू शकतो. जगभरात अचानक फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये, हे स्फोट प्राणघातक देखील ठरले आहेत. चार्जिंगला लावलेला मोबाईल फोन ब्लास्ट होण्याची घटनाअनेकदा घडली आहे. अशीच एक घटना अमरावती येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.


अमरावतीतील साईधामनगर येथील संजय टाले यांचा घरी ही घटना सकाळी ११ वाजता घडली. मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज व आवाका एवढा मोठा होता की संपुर्ण घरात कंपन झाले होते. स्फोटाच्या आवाजाने संजय टाले यांची पत्नी हॉलमध्ये आल्या असता मोबाईला आग लागलेलीत्यांना दिसली तसेच बाजूच्या कपड्यांनीसुद्धा पेट घेतला होता. त्यांनी प्लगचे बटन स्वीचऑफ केले व मोबाईलवर पाणी टाकले. सतर्कतेने मोठी हानी टळली. त्यावेळी घराच्या बेडरूममध्ये सुदैवाने कोणी नव्हते. संजय टाले यांनी सांगीतले की, मोबाईलच्या स्फोटाचा आवाज खुप मोठा होता.


घर थोडक्यात बचावले. पत्नीने जर तात्काळ येऊन मोबाईलची आग विझवली नसती तर खूप मोठी हानी झाली असती.मोबाईल स्फोट कसा होतो, तो आम्ही अनुभवलेला आहे. कुणीही चार्जिंगवर लावून मोबाईल पाहू नये व विशेष करून मोबाईल लहान मुलांना देऊ नये. नाहीतर खूप मोठी नुकसान होऊ शकते, असे संजय टाले यांनी सांगितले

Comments
Add Comment

महिला शेतकऱ्यांच्या श्रमाला कायद्याचे कवच

विधानसभेत विशेष विधेयक; जमिनीची प्रत्यक्ष मालकी नसली तरी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा मुंबई (सुहास

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाचा व्हिडिओ व्हायरल

सिया-चेतनच्या कथित नात्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तपासाला नवे वळण? पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या

Vidhan Sabha : महत्त्वाच्या चर्चेवेळी अधिकाऱ्यांची दांडी, नगरविकास सचिवांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

मुंबई : मुंबईशी (Mumbai) संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर विधानसभेत चर्चा सुरू असताना, अधिकारी

Maharashtra Rain Alert : हवामान विभागाचा इशारा: राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढचे १०० तास महत्त्वाचे

पुढील आठवड्यात महाराष्ट्रात दमदार पाऊस  मुंबई : पुणे वेधशाळेने ५ ते ७ जुलैदरम्यान महाराष्ट्रभर समाधानकारक ते

Nitesh Rane : मुंद्रा पोर्टच्या अत्याधुनिक व्यवस्थापनाचा महाराष्ट्राच्या बंदर विकासासाठी उपयोग होणार – नितेश राणे

आधुनिक बंदर व्यवस्थापनाचा महाराष्ट्राला लाभ; करण अदानींसोबत नितेश राणेंची चर्चा News: मुंबई : महाराष्ट्राचे

Pankaja Munde : वाडी नगरपरिषदेचा एसटीपी प्रकल्प ३० ऑगस्टपर्यंत कार्यान्वित होणार

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची विधान परिषदेत ग्वाही मुंबई : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतील