मे महिन्यात उकाड्याचा कहर! ११ दिवस उष्णतेची लाट वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज

  128

नवी दिल्ली : २०२५ च्या मे महिन्यात भारताला प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागांत सामान्यपेक्षा १ ते ४ दिवस अधिक उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.


आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये आधीच ७२ उष्णतेच्या लाटांचे दिवस नोंदवले गेले असून, मे महिन्यात ही संख्या आणखी वाढू शकते. गुजरात व राजस्थानमध्ये ६ ते ११ दिवस, तर विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे ४ ते ६ दिवस ही लाट राहू शकते. महाराष्ट्रात तुलनेने कमी परिणाम होईल, परंतु उष्णतेपासून पूर्ण सूट मिळणार नाही.


तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे, मे महिन्यात वारंवार येणाऱ्या वादळांमुळे तापमान काहीसं नियंत्रणात राहू शकते. मे २०२४ मध्ये जसे अती तापमान पाहायला मिळाले, तशी स्थिती यंदा टळण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात पावसाची पातळी सामान्य ते जास्त राहील. मात्र वायव्य, मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते.


उत्तर भारतात मात्र, १०९ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar) 

काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार, तीन दलित मुलांना खांबाला बांधून बेदम चोपले

गडग : काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये दलितांवर अत्याचार होत असल्याचे वृत्त आहे. कर्नाटकमधील गडग