मे महिन्यात उकाड्याचा कहर! ११ दिवस उष्णतेची लाट वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज

नवी दिल्ली : २०२५ च्या मे महिन्यात भारताला प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागांत सामान्यपेक्षा १ ते ४ दिवस अधिक उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.


आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये आधीच ७२ उष्णतेच्या लाटांचे दिवस नोंदवले गेले असून, मे महिन्यात ही संख्या आणखी वाढू शकते. गुजरात व राजस्थानमध्ये ६ ते ११ दिवस, तर विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे ४ ते ६ दिवस ही लाट राहू शकते. महाराष्ट्रात तुलनेने कमी परिणाम होईल, परंतु उष्णतेपासून पूर्ण सूट मिळणार नाही.


तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे, मे महिन्यात वारंवार येणाऱ्या वादळांमुळे तापमान काहीसं नियंत्रणात राहू शकते. मे २०२४ मध्ये जसे अती तापमान पाहायला मिळाले, तशी स्थिती यंदा टळण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात पावसाची पातळी सामान्य ते जास्त राहील. मात्र वायव्य, मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते.


उत्तर भारतात मात्र, १०९ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन

महिलांची हातचलाखी सीसीटीव्हीत दिसली, सोन्याची अंगठी चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगरमधील विजय चौक परिसरातील एका ज्वेलरी दुकानात महिलांनी सोन्याची अंगठी

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.