मे महिन्यात उकाड्याचा कहर! ११ दिवस उष्णतेची लाट वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज

नवी दिल्ली : २०२५ च्या मे महिन्यात भारताला प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागांत सामान्यपेक्षा १ ते ४ दिवस अधिक उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.


आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये आधीच ७२ उष्णतेच्या लाटांचे दिवस नोंदवले गेले असून, मे महिन्यात ही संख्या आणखी वाढू शकते. गुजरात व राजस्थानमध्ये ६ ते ११ दिवस, तर विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे ४ ते ६ दिवस ही लाट राहू शकते. महाराष्ट्रात तुलनेने कमी परिणाम होईल, परंतु उष्णतेपासून पूर्ण सूट मिळणार नाही.


तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे, मे महिन्यात वारंवार येणाऱ्या वादळांमुळे तापमान काहीसं नियंत्रणात राहू शकते. मे २०२४ मध्ये जसे अती तापमान पाहायला मिळाले, तशी स्थिती यंदा टळण्याची शक्यता आहे.


आयएमडीच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात पावसाची पातळी सामान्य ते जास्त राहील. मात्र वायव्य, मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते.


उत्तर भारतात मात्र, १०९ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात