
मुंबई : देशातल्या विविध भागात उष्णतेचा कहर होणार असून तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत जाण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच १ मे ते २ जून २०२५ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या काळात सूर्यप्रकाशात फिरल्याने गुदमरल्यासारखे वाटणे, घाम न येणे, उलट्या, चक्कर येणे, उष्माघात (हीट स्ट्रोक) होऊ शकतो. अशा वेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घरी घ्या ही खबरदारी:
-
खोलीचा दरवाजा आणि खिडक्या थोड्या उघड्या ठेवा – हवा खेळती राहील.
-
मोबाईल फोन अत्यंत गरजेपुरता वापरा – उष्णतेने बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता!
-
शक्य असल्यास दर दोन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या.
-
घरातील AC २४-२५°C वर ठेवा – जास्त थंडपणा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो.
शरीर थंड ठेवण्यासाठी हे प्या:
-
दही, ताक, उसाचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी
-
थंड पाणी – दिवसात कमीत कमी ३ ते ४ लिटर पाणी प्या
-
गरम व तेलकट पदार्थ, चहा-कॉफी टाळा
गाडी चालवताना या गोष्टी लक्षात ठेवा:
-
सकाळी गाडीने प्रवास टाळा
-
गाडीतील गॅस सिलिंडर, लाइटर, परफ्यूम, कोल्ड्रिंक्स, बॅटर्या काढून टाका
-
कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा (व्हेंटिलेशनसाठी)
-
कारचे टायर जास्त फुगवू नका – उष्णतेने फुटण्याचा धोका
-
इंधन टाकी पूर्ण भरू नका, संध्याकाळी इंधन भरा
सर्पदंश आणि विंचवांपासून सावधगिरी:
-
साप, विंचू उष्णतेमुळे थंड जागांचा शोध घेतात
-
बागेत, अंगणात आणि घरात तपासणी करा
-
शक्य असल्यास रात्री उघड्या पायाने फिरणे टाळा
वीज आणि इंधन सुरक्षेबाबत खबरदारी:
-
गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका
-
AC फक्त गरज असेल तेव्हाच वापरा
-
घरातील वीज मीटर आणि वायरिंग ओव्हरलोड होणार नाही याची खात्री करा