Temple Wall Collapse: मंदिराची भिंत कोसळल्याने ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

विशाखापट्टणम: बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान मंदिराची भिंत कोसळल्याने (Temple Wall Collapse) ८ जणांचा मृत्यू झाला आहे, यात चारजण जखमी झाले. एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.


बुधवारी सकाळी विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळून सात भाविकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. वार्षिक चंदनोत्सवादरम्यान ही घटना घडली,


वृत्तसंस्था एएनआयनुसार, बुधवारी सकाळी विशाखापट्टणम येथील श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सवम उत्सवादरम्यान बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. ही घटना रात्री २.३० च्या सुमारास घडली. यादरम्यान त्या ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत होता.



२० फूट लांबीचा भाग कोसळल्याने मृत्यू


श्री वराहलक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा २० फूट लांबीचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्दैवी घटना घडली. राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी या अपघातासंदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले कि, "रात्रभर मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे माती सैल झाली होती, ज्यामुळे भिंत कोसळली. सिंहगिरी बसस्थानकापासून घाट रस्त्यावरील शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ३०० रुपयांच्या तिकिटाच्या रांगेत ही भिंत पडली.



मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी २५ लाखांची मदत देण्याची घोषणा


टेलिकॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेताना, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत जाहीर केली. याशिवाय, प्रत्येक पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याला देणगी विभागांतर्गत मंदिरांमध्ये आउटसोर्सिंगची नोकरी दिली जाईल. तसेच या घटनेची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.



पंतप्रधान मोदींनीही केली भरपाईची घोषणा


ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दाखल घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने