Fire incident: कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा मृत्यू

  39

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात साधारण १४ जणांचा मृत्यू झालाय. एजन्सीच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, मंगळवारी मध्य कोलकातामध्ये फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. ऋतुराज हॉटेल परिसरात ही घटना घडली. घटनास्थळावरून १४ मृतदेह हाती घेण्यात आले.


 


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र पूर्व भारतातील सर्वात गजबजेचा परिसर असलेल्या बुर्राबाजारमध्ये आपातकालीन सेवामध्ये काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर अनेकांनी इमारतीच्या खिडक्या तसेच मधल्या भिंतींवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने