Fire incident: कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा मृत्यू

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात साधारण १४ जणांचा मृत्यू झालाय. एजन्सीच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, मंगळवारी मध्य कोलकातामध्ये फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. ऋतुराज हॉटेल परिसरात ही घटना घडली. घटनास्थळावरून १४ मृतदेह हाती घेण्यात आले.


 


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र पूर्व भारतातील सर्वात गजबजेचा परिसर असलेल्या बुर्राबाजारमध्ये आपातकालीन सेवामध्ये काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर अनेकांनी इमारतीच्या खिडक्या तसेच मधल्या भिंतींवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था!

नवी दिल्ली : भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

'एलपीजी सबसिडी'चे सूत्र बदलणार

केंद्र सरकार नवा निर्णय घेण्याच्या तयारीत! नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडीच्या मोजणीत

भारतात मिळतेय बनावट रेबीज लस

दरवर्षी २० हजार लोकांचा मृत्यू, ऑस्ट्रेलियाचा इशारा नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियामध्ये लसीकरणासाठी काम करणाऱ्या

दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये ८ जणांचा मृत्यू

११०० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने