Fire incident: कोलकातामधील हॉटेलमध्ये भीषण आग, १४ जणांचा मृत्यू

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. यात साधारण १४ जणांचा मृत्यू झालाय. एजन्सीच्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, मंगळवारी मध्य कोलकातामध्ये फलपट्टी मछुआ येथे एका हॉटेलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. ऋतुराज हॉटेल परिसरात ही घटना घडली. घटनास्थळावरून १४ मृतदेह हाती घेण्यात आले.


 


आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र पूर्व भारतातील सर्वात गजबजेचा परिसर असलेल्या बुर्राबाजारमध्ये आपातकालीन सेवामध्ये काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. आग लागल्यानंतर अनेकांनी इमारतीच्या खिडक्या तसेच मधल्या भिंतींवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१