बनावट नोटा पुण्यात कुठे छापल्या जात होत्या? शिवाजीनगर पोलिसांच्या कारवाईनं उघडली नोटा माफियांची गुपित यंत्रणा! २८ लाखांवर बनावट नोटा जप्त !

  29

पुणे : शिवाजीनगरच्या मध्यवर्ती भागात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आलं आहे. २८ लाखांहून अधिक बनावट नोटा, २ लाखांहून अधिक खऱ्या नोटा आणि अत्याधुनिक नोटा छपाईसाठी वापरलं जाणारं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. ही संपूर्ण यंत्रणा इतकी व्यावसायिक पद्धतीनं उभी केली गेली होती, की बँकेच्या सीडीएम मशीनलाही हे चलन खऱ्या नोटा समजून स्वीकारत होतं!


१७ एप्रिल रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या मशीनमध्ये ५५ बनावट २०० रुपयांच्या नोटा सापडल्यानंतर पोलिसांची शंका बळावली आणि सुरू झाला तपास. शिवाजीनगर पोलिसांच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण करत मनिषा ठाणेकर, भारती गवंड आणि सचिन यमगर या तिघांना अटक केली. चौकशीत त्यांनी ‘मास्टरमाइंड’ नरेश शेटटीचं नाव उघड केलं.



नरेशच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकताच खळबळजनक माहिती समोर आली. त्याच्या घरी सापडल्या तब्बल २३.३२ लाखांच्या बनावट नोटा – २०० रुपयांचे २० बंडल, ५०० च्या २३२ नोटा, १११६ प्रिंटेड कागद, प्रिंटर, शाई आणि आणखी सगळं साहित्य. एवढंच नाही तर त्याच्या कारमधूनही ६४८ बनावट नोटा आढळल्या.


याशिवाय आरोपी प्रभू गुगलजेडडी यालाही पोलिसांनी अटक केली. संपूर्ण टोळी बनावट नोटा बाजारात पेरण्यासाठी सुसूत्र योजना आखून काम करत होती.


शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईत सुमारे ३० लाखांचा बनावट चलन साठा, छपाई यंत्रणा आणि पाच आरोपींच्या अटकेसह मोठा कट उध्वस्त करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी