पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला करणारा पाकिस्तानच्या लष्करात होता SSG कमांडो

  32

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ जणांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटकांची आणि एका स्थानिकाची हत्या अतिरेक्यांनी केली. या घटनेने पूर्ण देश हादरला. जगभरातून अतिरेक्यांच्या विरोधात कठोर कारवाईसाठी भारताला जाहीर पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती हाती आली आहे.







पाकिस्तान पुरस्कृत असलेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी झालेला एक अतिरेकी हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी कमांडो होता. जम्मू काश्मीर पोलिसांनी पहलगाम हल्ल्यानंतर अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात हाशिम मुसा नावाच्या अतिरेक्याचे चित्र आहे. तोच हा अतिरेकी आहे. हाशिम मुसा हा मूळचा पाकिस्तानच्या लष्करातील एसएसजी (स्पेशल सर्व्हिस ग्रुप) कमांडो होता.



मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो आहे. लष्करी सेवेतून बाहेर पडल्यानंतर मुसा लष्कर - ए - तोयबा या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात आला. कलम ३७० हटवल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये आर्थिक प्रगती सुरू आहे. या प्रगतीत अडथळा निर्माण करण्यासाठी आणि जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला ब्रेक लावण्यासाठी अतिरेक्यांनी पहलगाम येथे पर्यटकांनाच लक्ष्य केले.

पर्यटकांना ठार करण्याआधी अतिरेक्यांना पाकिस्तानच्या लष्कराकडून प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळेच अतिरेक्यांनी सहजतेने गोळीबार करुन पर्यटकांना लक्ष्य केले. अतिरेकी हल्ल्यासाठी पाकिस्ताननेच आर्थिक मदत दिली होती. या व्यतिरिक्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या १५ जणांनी अतिरेक्यांना स्थानिक पातळीवर हवी ती मदत पुरवल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास आता एनआय करत आहे.
Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात