नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळायचं... हेच तुमचं राजकारण का? फडणवीसांनी वडेट्टीवारांना फटकारले!

मुंबई : पहलगाममध्ये धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या, २६ निष्पापांचा बळी गेला, त्यात महाराष्ट्राच्या ६ जणांचा समावेश आहे. देश हळहळतोय, संतापतोय... आणि इथे काही नेते त्या जखमांवर राजकारणाचे मीठ चोळायला मोकळे झालेत! देशभरात संतापाचा भडका उडला आहे. तरीही महाराष्ट्रात काही नेते या दु:खावर राजकारण करत आहेत. याला काय म्हणायचे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे.


काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट घणाघात केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, "दहशतवाद्यांना कुठे धर्म विचारायला वेळ असतो?" हे म्हणजे ज्यांनी प्राण गमावले, त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथेवरही अविश्वास? कुठे चाललेय राजकारण?



यावर फडणवीस संतापून म्हणाले, "तिथे वडेट्टीवार नव्हते! मग नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळून मुंबईत कमेंट करण्याचा अधिकार यांना कुठून येतो? प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं सत्य आणि नातेवाईकांचं थेट सांगणं यालाही हे नेते नाकारतात! तर हे फक्त मूर्खपणाच नाही, तर ही क्रूर असंवेदनशीलता आहे!"


मुख्यमंत्र्यांनी थेट सवाल केला आहे की, "ज्यांनी जिवंतपणी हत्येचा थरकाप अनुभवला, त्यांच्या सांगण्याला खोटं ठरवणं, हे माणुसकीला शोभतं का? ज्यांनी जवळच्यांचा मृत्यू पाहिला, त्यांचं दुःख खोटं ठरवणं, याहून मोठं पाप दुसरं कोणतं?"


देशावर झालेल्या हल्ल्याला कमी लेखणं, आणि मरणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या भावनांना तुडवणं, हे असंवेदनशीलतेचं नव्हे तर राष्ट्रद्रोहाच्या सीमेला छेद देणारं आहे. देशावर आघात करणाऱ्या घटनेवर राजकीय टीका करताना संवेदनशीलतेचा बळी दिला जातोय का, हे विचार करायची वेळ आली आहे!

Comments
Add Comment

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.