RR vs GT, IPL 2025: वैभवच्या धावांचे वादळ, राजस्थानचा गुजरातवर ८ विकेट राखत विजय

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर राजस्थानने हे आव्हान १५.५ षटके आणि ८ विकेट राखत पूर्ण केले.


राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला वैभव सूर्यवंशी.  वैभवने ३८ बॉलमध्ये ७ चौकार आणि ११ षटकारांच्या जोरावर १०१ धावा ठोकल्या. सलामीवीर यशस्वी जायसवालनेही ७० धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळेच राजस्थानला १५.५ षटकांत हे इतके मोठे आव्हान गाठता आले.

तत्पूर्वी टॉसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या गुजरातची सुरूवात शानदार राहिली. शुभमन गिल आणि साई सुदर्शनने प्रत्येक गोलंदाजाला झोडून काढले. गिलने आक्रमक फलंदाजी केली आणि २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दुसरीकडून सुदर्शननेही चौकार-षटकारांचा पाऊस केला. १० षटकांत गुजरातची धावसंख्या बिनबाद ९२ होती. ११व्या षटकांत गुजरातला पहिला झटका बसला तो म्हणजे साई सुदर्शन बाद झाला. त्याने ३९ धावांची खेळी केली.


यानंतर बटलर आणि गिलने मोर्चा सांभाळला. दोघांनी जोरदार फलंदाजी केली. १५व्या षटकांत गुजरातची धावसंख्या दीडशेपार गेली. १७व्या षटकांत गिलची विकेट पडली. गिलने ५० बॉलमध्ये ८४ धावांची खेळी केली. यानंतर बटलरनेही अर्धशतक ठोकले. याच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर विजयासाठी २१० धावांचे आव्हान ठेवले.

Comments

megha malik    April 29, 2025 02:41 PM

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत शानदार विजय मिळवला! 💥 वैभव सूर्यवंशीच्या तुफानी शतकाने RR ने २१० धावांचा मोठा टार्गेट १५.५ षटकारात पूर्ण केला! 😲🔥 यशस्वी जायसवालनेही दमदार ७० धावा केल्या! 👏 गुजरातच्या शुभमन गिलने ८४ धावा केल्या, पण RR च्या आक्रमक खेळीपुढे तो कमी पडला! 🏏

Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण