RR vs GT, IPL 2025: गुजरातची पात्रता फेरीकडे घोडदौड

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. पहिल्या फेरीतील सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानया ५८ धावानी पराभव केला. गुजरातचा संघ १२ गुणांसह गुण तक्त्यात अव्वल आहे, तर राजस्थान रॉयल्सने फक्त चारच गुण मिळवले आहेत. त्यांच्यासाठी जिंकणे गरजेचे आहे कारण हरल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.


या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ फार कमी धावानी पराभूत झाला आहे. त्यांनी २-३ सामने अगदी हातातोंडाशी आल्यावर पराभूत झाले. त्यांची सुरुवात तर यशस्वी जयस्वाल चांगली करतो पण मधल्या फळीतील फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळत नाही. नितीश राणा, हेटमायर, जुरेल हे फलंदाज फिनिशर म्हणून खेळत नाही आणि त्यामुळे त्यांना सामना थोड्या धावांनी गमवावा लागतो. गोलंदाजीमध्ये आर्चर हाच नेहमी चांगली खेळी करतो आहे; परंतु संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांच्याकडून चांगली साथ मिळत नाही आहे.


राजस्थानला आजचा सामना जिंकायचा असेल, तर फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत बदल करावे लागतील. रियान परागला त्याच्या कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडावी लागेल, जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मैदानावर संयमाने खेळून धावा कराव्या लागतील. गुजरात बाकी त्याचा नेहमीचा खेळ करेल, ते सामना जिंकून पात्रता फेरीत आपले स्थान कायम करण्याचा प्रयत्न करतील. चला तर बघूया राजस्थान गुजरातची घोडदौड थांबवणार का?

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना