RR vs GT, IPL 2025: गुजरातची पात्रता फेरीकडे घोडदौड

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने येणार आहेत. पहिल्या फेरीतील सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानया ५८ धावानी पराभव केला. गुजरातचा संघ १२ गुणांसह गुण तक्त्यात अव्वल आहे, तर राजस्थान रॉयल्सने फक्त चारच गुण मिळवले आहेत. त्यांच्यासाठी जिंकणे गरजेचे आहे कारण हरल्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.


या हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ फार कमी धावानी पराभूत झाला आहे. त्यांनी २-३ सामने अगदी हातातोंडाशी आल्यावर पराभूत झाले. त्यांची सुरुवात तर यशस्वी जयस्वाल चांगली करतो पण मधल्या फळीतील फलंदाजांकडून त्याला चांगली साथ मिळत नाही. नितीश राणा, हेटमायर, जुरेल हे फलंदाज फिनिशर म्हणून खेळत नाही आणि त्यामुळे त्यांना सामना थोड्या धावांनी गमवावा लागतो. गोलंदाजीमध्ये आर्चर हाच नेहमी चांगली खेळी करतो आहे; परंतु संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांच्याकडून चांगली साथ मिळत नाही आहे.


राजस्थानला आजचा सामना जिंकायचा असेल, तर फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही बाबतीत बदल करावे लागतील. रियान परागला त्याच्या कर्णधार पदाची जबाबदारी पार पाडावी लागेल, जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा मैदानावर संयमाने खेळून धावा कराव्या लागतील. गुजरात बाकी त्याचा नेहमीचा खेळ करेल, ते सामना जिंकून पात्रता फेरीत आपले स्थान कायम करण्याचा प्रयत्न करतील. चला तर बघूया राजस्थान गुजरातची घोडदौड थांबवणार का?

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण