Pakistani YouTube Channel Banned: पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरू न देण्यासाठी कारवाई

Share

नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी (Pakistani YouTube Channel Banned) घालण्यात आली आहे.

भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध भडकाऊ, खोटी, दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती पसरू नये म्हणून सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.

अनेक मोठ्या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तान विरुद्ध सतत कठोर कारवाई करत आहे. आता मोदी सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. तो म्हणजे केंद्राने पाकिस्तानातील अनेक मोठ्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.

या युट्युब चॅनल्सचा समावेश

बंदी घालण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्समध्ये शोएब अख्तर, आर्जू काझमी आणि सय्यद मुजम्मिल शाह या प्रसिद्ध लोकांच्या चॅनेल्सचादेखील समावेश आहे. तसेचज डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. यांवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षादलांविरोधात खोटी, दिशाभूल करणारी माहिती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी सामग्री पसरवल्याचा आरोप आहे.

Recent Posts

Ranveer Allahbadia: सुप्रीम कोर्टाचा रणवीर अलाहाबादियाला मोठा दिलासा, जप्त केलेला पासपोर्ट परत मिळणार

मुंबई: प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाला सर्वोच्च न्यायालया (Supreme Court) कडून मोठा दिलासा मिळाला…

2 minutes ago

हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा

नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार…

22 minutes ago

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

मुंबई: रीलस्टार सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक‘ चित्रपट तीन दिवसांपूर्वी लोकांच्या भेटीला आला…

51 minutes ago

‘त्या’ पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावा लागणार नाही…, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची माहिती

पुणे: पहलगाम (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचे निर्दश सरकारने दिले…

57 minutes ago

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, मच्छीमार बांधवांना किसान कार्डचे वाटप

मुंबई : महाराष्ट्र शासनाने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला…

1 hour ago