भारताचा ‘जलप्रहार’?, झेलमच्या रौद्र पाण्याने पाकिस्तानात हाहाकार

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत सिंधू जल करार स्थगित केला. तेव्हापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांना आता भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीती वाटत आहे. दरम्यान, शनिवारी (दि. २६)  झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पूर आला आहे.



अचानक झेलम नदीमध्ये पाणी सोडल्याने ही पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे, असे पाकचा आरोप आहे. अचानक आलेल्या पुरामुळे पीओके राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटी येथे स्थानिक अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरद्वारे इशारा द्यावा लागला.



सिंधूचे पाणी रोखण्याची भारताकडून तयारी सुरू 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीसंदर्भात एक बैठक घेतली. ज्यामध्ये पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन प्रमुख पर्यायांवर विचार केला गेला. पाकिस्तानकडे एक थेंबही पाणी जाऊ नये असा सरकारचा ठाम निर्धार आहे. बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की पाणी रोखण्यासाठी प्रत्येक शक्य त्या उपायांवर त्वरित काम सुरू करण्यात येईल. याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



पाणी रोखाल, तर १३० अणुबॉम्ब तयार ठेवलेत; पाकिस्तानच्या मंत्र्याची दर्पोक्ती


भारत पाकिस्तानाला धडा शिकविण्याच्या तयारीत असतानाच पाकिस्तानच्या मंत्र्याने चक्क भारतालाच अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानचे मंत्री हनिफ अब्बासी यांनी भारताला उघडपणे अणुहल्ल्याची धमकी दिली. पाकिस्तानकडे असलेली घोरी, शाहीन आणि गजनवी ही क्षेपणास्त्रे आणि १३० अणुबॉम्ब फक्त भारतासाठीच ठेवले आहेत. जर भारताने सिंधू जल करार थांबवून पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर भारताला पूर्ण युद्धासाठी तयार
राहावे लागेल.


Comments
Add Comment

Share Market Update : जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे; आशियामध्ये संमिश्र व्यवहार

मुंबई : आज जागतिक बाजारपेठांमध्ये कमजोरीची चिन्हे दिसत आहेत. मागील सत्रात अमेरिकन बाजारपेठा घसरणीसह बंद झाल्या.

Rajnath Singh : भारत भविष्यात इराण-अमेरिका यांच्यात मध्यस्थीची भूमिका निभावू शकतो - राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जर्मनीच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी इराण-अमेरिका यांच्यातील

Fighter Jets Landing : एक्सप्रेस वे वर उतरली लढाऊ विमानं, भारताच्या हवाई दलाचं शक्ती प्रदर्शन

सुलतानपूर : उत्तर प्रदेशमधील सुलतानपूर येथे पूर्वांचल एक्सप्रेस वे वर भारताची लढाऊ विमानं एकामागून एक या

Kedarnath Mandir : हर हर महादेवच्या गजरात उघडले केदारनाथ मंदिराचे द्वार

देहरादून : केदारनाथ धामाचे द्वार आज, बुधवारी सकाळी आठ वाजता शुभ मुहूर्तावर विधी-विधान आणि पूजा-अर्चना करून

Pahalgam Attack : ओल्या जखमेची वर्षपूर्ती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यात शहिदांना वाहिली श्रद्धांजली

पहलगाम : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस नागरिकांनी

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या