Mumbai-Goa highway : कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा; तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्गात दरडी कोसळण्याचा धोका

पोलादपूर (शैलेश पालकर) : कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. येथील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला असून नवीन महामार्ग भुयारी मार्गे वळवण्यात आला आहे. या ठिकाणी भोगावच्या हद्दीत घाटरस्त्याला पाच ते दहा मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येत्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्यास भुयाराकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



कशेडी घाटरस्त्यावर भेगा पडल्याने भुस्खलन होऊन नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महामार्ग प्रशासनाकडून तात्काळ उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारी मार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे.


भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या नवीन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर दरडी कोसळून महामार्गावरील वाहतूक जुना घाटरस्ता खचल्याने धोकादायक आणि नवीन पर्यायी भुयारी मार्गात दरडी कोसळण्याच्या शक्यतेने धोकादायक अशी परिस्थिती उदभवणार आहे.



मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटरस्ता भेगा पडल्याने पर्यायी भुयारी मार्गापर्यंत जोडणाऱ्या नवीन रस्त्यावर घाटरस्ता कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भेगा पडलेल्या भागातील घाटरस्त्यावरून वाहतूक टाळण्यासाठी केलेल्या बंदोबस्ताचे दृश्य (छाया-शैलेश पालकर)

Comments
Add Comment

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.