तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात तहव्वूर राणा याला दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने बारा दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.



तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे. त्याने पाकिस्तानच्या लष्करात डॉक्टर म्हणून काम केले होते. कॅप्टन पदापर्यंत त्याला बढती मिळाली होती. पुढे तो लष्करातली नोकरी सोडून व्यावसायिक होण्यासाठी कॅनडाला गेला. कॅनडाचा नागरिक झाला. व्यवसायाच्या निमित्ताने विविध देशांचे दौरे करू लागला. भारतात व्यवसायाच्या निमित्ताने येऊन तहव्वूर राणाने मुंबईची पाहणी केली. नंतर तहव्वूर राणाने दिलेल्या माहितीचा वापर करुन पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता.



व्यावसायिक असल्याचे नाटक करुन मूळचा पाकिस्तानचा आणि नंतर कॅनडाचा नागरिक झालेला तहव्वूर राणा लष्कर - ए -तोयबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करत होता. तहव्वूर राणा हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा एक सूत्रधार आहे, असा आरोप भारतीय तपास संस्थांनी केला आहे. सध्या तहव्वूर राणा विरोधात दिल्लीच्या एनआयए न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

याआधी अतिरेकी संघटनेशी आणि त्यांच्या कट कारस्थानाशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन तहव्वूर राणाला अमेरिकेच्या तपास यंत्रणेने अटक केली होती. राणाला अमेरिकेच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. पण काही वर्षांनंतर तब्येतीचे कारण सांगून तहव्वूर राणाने जामीन मिळवला होता. यानंतर काही वर्षांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून मार्ग निघाला. अखेर तहव्वूर राणाला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून १० एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत विशेष विमानाने आणण्यात आले. यानंतर सखोल चौकशी करुन अखेर तहव्वूर राणाला एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी दिली.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे