तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता. या प्रकरणात तहव्वूर राणा याला दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने बारा दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.



तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे. त्याने पाकिस्तानच्या लष्करात डॉक्टर म्हणून काम केले होते. कॅप्टन पदापर्यंत त्याला बढती मिळाली होती. पुढे तो लष्करातली नोकरी सोडून व्यावसायिक होण्यासाठी कॅनडाला गेला. कॅनडाचा नागरिक झाला. व्यवसायाच्या निमित्ताने विविध देशांचे दौरे करू लागला. भारतात व्यवसायाच्या निमित्ताने येऊन तहव्वूर राणाने मुंबईची पाहणी केली. नंतर तहव्वूर राणाने दिलेल्या माहितीचा वापर करुन पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला होता.



व्यावसायिक असल्याचे नाटक करुन मूळचा पाकिस्तानचा आणि नंतर कॅनडाचा नागरिक झालेला तहव्वूर राणा लष्कर - ए -तोयबा या अतिरेकी संघटनेसाठी काम करत होता. तहव्वूर राणा हा मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा एक सूत्रधार आहे, असा आरोप भारतीय तपास संस्थांनी केला आहे. सध्या तहव्वूर राणा विरोधात दिल्लीच्या एनआयए न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

याआधी अतिरेकी संघटनेशी आणि त्यांच्या कट कारस्थानाशी संबंधित असल्याच्या आरोपावरुन तहव्वूर राणाला अमेरिकेच्या तपास यंत्रणेने अटक केली होती. राणाला अमेरिकेच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. पण काही वर्षांनंतर तब्येतीचे कारण सांगून तहव्वूर राणाने जामीन मिळवला होता. यानंतर काही वर्षांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चेतून मार्ग निघाला. अखेर तहव्वूर राणाला मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून १० एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत विशेष विमानाने आणण्यात आले. यानंतर सखोल चौकशी करुन अखेर तहव्वूर राणाला एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिल्लीच्या एनआयए न्यायालयाने तहव्वूर राणाला १२ दिवसांची एनआयए कोठडी दिली.
Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या