MI vs LSG, IPL 2025: जो जिता वोही सिंकदर

  101

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर लखनऊशी भिडणार आहे.आयपीएल २०२५ मध्ये मुंबई व लखनऊ हे दुसऱ्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या अगोदरच्या सामन्यात लखनऊने मुंबईला १२ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असणार. आयपीएलच्या अठराव्या हंगामात आता चुरस निर्माण झाली आहे, गुणतक्त्यात जे संघ अव्वल आहेत त्या प्रत्येकाची जिंकण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.


गुणांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई व लखनऊ यांचे गुण समान आहेत परंतु मुंबईची सरासरी ही लखनऊ पेक्षा चांगली आहे त्यामुळे मुंबई वरच्या स्थानी आहे. दोन्ही संघाचा विचार करायचा झाल्यास अगोदरच्या सामन्यात मुंबईकडे बुमराह नव्हता त्यामुळे त्यांची गोलंदाजी परिपूर्ण नव्हती. आजच्या सामन्यात मुंबई पूर्ण ताकदीने खेळेल कारण त्यांना मागील पराजयाचा वचपा काढायचा आहे.


लखनऊही मुंबईला हलक्यात घेणार नाही कारण आजचा विजय त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अन्यथा नंतर त्यांना पात्रता फेरी गाठण्यासाठी आणखी अडचणी येऊ शकतात. या अगोदरचा सामना लखनऊने दिल्ली विरुद्ध गमावला आहे त्यामुळे आज ते जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील.वानखेडेवर दोन्ही संघाचा भर हा फलंदाजीवरच असेल कारण हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांचे सलामीचे फलंदाज फॉर्म मध्ये आहेत.
चला तर जाणून घेऊयात आजच्या सामन्याचा सिंकदर कोण!

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र