DC vs RCB, IPL 2025: आरसीबीचा दिल्लीवर ६ विकेट राखून विजय, कोहली-कुणालची कमाल

दिल्ली: इंडियन प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला पराभवाचा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्लीला ६ विकेटनी हरवले. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात आरसीबीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दिल्लीने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १६२ धावा केल्या होत्या. या विजयासह आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत.


आरसीबीकडून कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी कमालीची फलंदाजी केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळेच आरसीबीला हा विजय साकारता आला. कृणालने या सामन्यात नाबाद ७३ धावा तडकावल्या. तर विराट कोहलीने ५१ धावांची खेळी केली.


दिल्लीकडून लोकेश राहुलने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. अभिषेक आणि फाफ डू प्लेसिस यांनी सुरूवात चांगली करून दिली. मात्र अभिषेक पोरेल २८ धावांवर बाद झाला. त्यानंतर करूण नायर स्वस्तात परतला. त्याने केवळ ४ धावा केल्या. प्लेसिसनेही २२ धावा ठोकल्या आणि तो बाद झाला. तीन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने एकीकडे किल्ला लढवत असताना ४१ धावा ठोकल्या. त्याने ३९ बॉलमध्ये ३ चौकार ठोकत ही धावसंख्या केली. कर्णधार अक्षऱ पटेलला १५ धावाच करता आल्या.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.