DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

  58

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली कॅपिटल व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अव्वल पदासाठी एकमेका विरुद्ध लढणार आहेत. दोन्ही संघ गुण तक्त्यात १२ गुणासह अव्वल स्थानी आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो १४ गुणासह अव्वल स्थानी विराजमान होईल. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहेत. अरुण जेटली स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे पण नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करेल कारण दुसऱ्या सत्रात या मैदानावर दव पडते त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होते.


दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटने पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल.


आज दिल्लीची गोलंदाजी कशी होणार यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून आहे. मिचेल स्टार्कने सुरुवातीलाच बेंगळुरूच्या फलंदाजाना बाद केले तर चित्र काही वेगळेच असेल. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सहजा सहजी हार मानणार नाही. ते सुरुवाती पासूनच आक्रमक खेळतील. दिल्लीची फिरकी अरुण जेटली मैदानावर काय पराक्रम दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अरुण जेटली मैदानावर कोण सर्वोत्तम खेळ करते ते पाहूच आपण.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र