DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली कॅपिटल व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अव्वल पदासाठी एकमेका विरुद्ध लढणार आहेत. दोन्ही संघ गुण तक्त्यात १२ गुणासह अव्वल स्थानी आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो १४ गुणासह अव्वल स्थानी विराजमान होईल. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहेत. अरुण जेटली स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे पण नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करेल कारण दुसऱ्या सत्रात या मैदानावर दव पडते त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होते.


दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटने पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल.


आज दिल्लीची गोलंदाजी कशी होणार यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून आहे. मिचेल स्टार्कने सुरुवातीलाच बेंगळुरूच्या फलंदाजाना बाद केले तर चित्र काही वेगळेच असेल. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सहजा सहजी हार मानणार नाही. ते सुरुवाती पासूनच आक्रमक खेळतील. दिल्लीची फिरकी अरुण जेटली मैदानावर काय पराक्रम दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अरुण जेटली मैदानावर कोण सर्वोत्तम खेळ करते ते पाहूच आपण.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत