DC vs RCB, IPL 2025: सामना अव्वल स्थानासाठी

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्ली कॅपिटल व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर अव्वल पदासाठी एकमेका विरुद्ध लढणार आहेत. दोन्ही संघ गुण तक्त्यात १२ गुणासह अव्वल स्थानी आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो १४ गुणासह अव्वल स्थानी विराजमान होईल. दोन्ही संघ फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी ठरत आहेत. अरुण जेटली स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे पण नाणेफेक जिंकणारा संघ नक्कीच प्रथम गोलंदाजी करेल कारण दुसऱ्या सत्रात या मैदानावर दव पडते त्यामुळे गोलंदाजी करणे कठीण होते.


दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्म मध्ये असल्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ६ विकेटने पराभव केला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच आज त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करेल.


आज दिल्लीची गोलंदाजी कशी होणार यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून आहे. मिचेल स्टार्कने सुरुवातीलाच बेंगळुरूच्या फलंदाजाना बाद केले तर चित्र काही वेगळेच असेल. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सहजा सहजी हार मानणार नाही. ते सुरुवाती पासूनच आक्रमक खेळतील. दिल्लीची फिरकी अरुण जेटली मैदानावर काय पराक्रम दाखवते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अरुण जेटली मैदानावर कोण सर्वोत्तम खेळ करते ते पाहूच आपण.

Comments
Add Comment

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय