World Malaria Day 2025 : जागतिक मलेरिया दिन! पण मलेरियाचा शोध कुणी लावला?

  83

आज २५ एप्रिल म्हणजे जागतिक मलेरिया दिन. डासांच्या चावण्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपैकी एक मलेरिया आहे. पण, मलेरिया हा डासांच्या चावण्यामुळे होतो, हा शोध नेमका लागला कसा? चला जाणून घेऊया या लेखातून...

?si=4j_HpswUBcQM3G4B

मलेरिया खरंतर जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून माणसाला होतोय.. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीक वैद्य हिपोक्रेटस यानेही मलेरियासारख्या आजाराची नोंद केलेली आढळते. पण, हा आजार डासांपासून होतो, हे शोधण्याचं श्रेय मात्र, डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटीश माणसाला जातं.

सन १८९८मध्ये त्यांनी हा शोध लावला. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. अॅनोफिलिस या प्रजातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास प्लाझमोडियम सारख्या परजीवी जंतूचा प्रसार करतो. या जंतुची अंडी आधी डासाच्या पोटात तयार होतात, मग ती डास चावल्यानंतर त्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरात जातात, हे रॉस यांनी शोधून काढलं.



थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणं दिसतात. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण कोमात जाऊन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेचं डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करणं, तिथे वेळोवेळी औषध फवारणी करणं गरजेचं असतं.
Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत