Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तानी हिंदूमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा करताना स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी हिंदूचा व्हिसा रद्द होणार नाही.


पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे लोग जे भारतात राहत आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाऊल मानवजातीला अनुसरून उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे हिंदू शरणार्थींची चिंता संपली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी करण्यात आला आहे त्यांना परत जावे लागणार नाही. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने हिंदू पलायन करून भारतात आले आहेत आणि येथील नागरिकतासाठी अर्ज करत आहेत. एका रिपोर्टनुसार, हजारो पाकिस्तानी हिंदू शरणार्थी विविध भारतीय शहरांमध्ये राहत आहेत.



दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत हिंदू शरणार्थी


राजस्थानच्या जोधपूर, जैसलमेर, बाडमेर आणि बिकानेर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदू शरणार्थींची संख्या मोठी आहे. जोधपूरमध्ये तर अनेक बेकायदेशीर कॉलनीज बनवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मजनू का टीला आणि आदर्शनगर या भागांमध्ये पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहे. दरम्यान, यातील काही शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. गुजरातच्या कच्छ आणि अहमदाबादमध्येही पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहेत. जम्मू शहरात साधारण २६ हजार ३१९ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची कुटुंबे आहेत.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात