Pakistani Hindu Visa: पाकिस्तानी हिंदूंचा व्हिसा रद्द होणार नाही, सरकारची घोषणा

  99

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पाकिस्तानी हिंदूमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने मोठी घोषणा करताना स्पष्ट केले आहे की पाकिस्तानी हिंदूचा व्हिसा रद्द होणार नाही.


पाकिस्तानी हिंदू अल्पसंख्याक समुदायाचे लोग जे भारतात राहत आहेत त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाऊल मानवजातीला अनुसरून उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे हिंदू शरणार्थींची चिंता संपली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की ज्या पाकिस्तानी हिंदूंना लाँग टर्म व्हिसा जारी करण्यात आला आहे त्यांना परत जावे लागणार नाही. पाकिस्तानातून मोठ्या संख्येने हिंदू पलायन करून भारतात आले आहेत आणि येथील नागरिकतासाठी अर्ज करत आहेत. एका रिपोर्टनुसार, हजारो पाकिस्तानी हिंदू शरणार्थी विविध भारतीय शहरांमध्ये राहत आहेत.



दिल्लीपासून ते गुजरातपर्यंत हिंदू शरणार्थी


राजस्थानच्या जोधपूर, जैसलमेर, बाडमेर आणि बिकानेर सारख्या जिल्ह्यांमध्ये हिंदू शरणार्थींची संख्या मोठी आहे. जोधपूरमध्ये तर अनेक बेकायदेशीर कॉलनीज बनवण्यात आल्या आहेत. दिल्लीतील मजनू का टीला आणि आदर्शनगर या भागांमध्ये पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहे. दरम्यान, यातील काही शरणार्थींना भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. गुजरातच्या कच्छ आणि अहमदाबादमध्येही पाकिस्तानी हिंदू शरणार्थी आहेत. जम्मू शहरात साधारण २६ हजार ३१९ पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची कुटुंबे आहेत.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या