Sugercane Juice : उसाचा रस प्या अन् गारेगार राहा!

  56

उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. शरीरात डिहायड्रेशन होण्याची भीती असते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरात थंडावा ठेवण्यासाठी अनेक पेय प्यायली जातात. गरमीमध्ये काही लोकांना बाहेर पडलं की सारखंच लिंबू पाणी किंवा इतर थंड पेय प्यावेसे वाटत असतात. तर काहींना उसाचा रस हा फार आवडीचा असतो. बाजारात उसाच्या रसाच्या गाड्या दिसू लागतात. उसाचा रस हे एक चविष्ट आणि किफायतशीर पेय आहे जे बाजारात सहज उपलब्ध आहे. उन्हाळ्यात उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही शिवाय यामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीराला एनर्जीसुद्धा मिळते. उसाचा रस पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात. या लेखातून जाणून घेऊया या फायद्यांबद्धल...



१. ऊर्जा मिळते


उसाचा रस प्यायल्याने शरीराला खूप ऊर्जा मिळते. विशेष म्हणजे ही ऊर्जा अनेक तास टिकून राहते. उसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या रसात नैसर्गिक साखर देखील असते, जी शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करण्यास मदत करते.




२. वजन कमी करण्यात मदत


वजन कमी करण्यातही उसाचा रस खूप फायदेशीर असतो. यात खूप फायबर असतं. या फायबरमुळं पोट खूप वेळ भरलेलं राहतं. इतर काही खावं वाटत नाही.




३. थकवा दूर होतो



उसाच्या रसामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. उन्हाळ्यात थकवा जाणवत असेल तर हा रस प्यायल्याने थकवा सुरू होईल.



४. मधुमेहीसुद्धा पिऊ शकतात


मधुमेहीसुद्धा उसाचा रस पिऊ शकतात. या रसात आईसोमाल्टोज नावाचं एक तत्व असतं. यात ग्लायसेमिकचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं मधुमेहींना उसाच्या रसापासून धोका पोचत नाही.




५. रोगप्रतिकारशक्ती वाढते



उसाचा रस प्यायल्याने आपलं शरीर स्वतःला अनेक बॅक्टरियल आणि व्हायरल संसर्गांपासून वाचवू शकतं. सोबतच त्यामुळं रोगप्रतिकारशक्तीही वाढते.



६. सुरकुत्या आणि पिगमेंटेशन दूर होईल



चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग, पांढरे चट्टे दूर करण्यासाठी उसाचा रस प्यायला पाहिजे. यात खूप प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतं.


(टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे