पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर राष्ट्रहिताच्या निर्णयांद्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील ३ दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहेत, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.





विशेष म्हणजे, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही ७२ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. याअंतर्गत कोणालाही भारतात परतण्याची किंवा थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही.


दरम्यान, जे भारतीय नागरिक सध्या पाकिस्तानात आहेत त्यांना तातडीने भारतात परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी (२४ एप्रिल) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.



भारत सरकारचा हा निर्णय केवळ सुरक्षा पावले उचलणं नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवाद पुरस्कृत धोरणांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार कोणते आणखी कडक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

भारताने होर्मुजच्या सामुद्रधुनीला शोधला सुरक्षित पर्याय

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. इराणने

India-China Relations : भारत चीन संबंध अधिक दृढ होणार; बीजिंग आणि दिल्ली दरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू

भारत आणि चीन दरम्यानची हवाई वाहतूक आता पूर्ववत होत आहे. नवी दिल्ली आणि चीनची राजधानी बीजिंग दरम्यानची विमानसेवा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशच्या उंच भागांत शुक्रवारी (२० मार्च) जोरदार हिमवृष्टी तर खालच्या भागांत मुसळधार पाऊस झाला. लाहौल

गुजरातमधील आश्रमात बनावट नोटांचा गोरखधंदा उघड

 पोलिसांकडून २ कोटी रुपयांहून अधिकच्या नोटा जप्त  अहमदाबाद गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहमदाबाद  :  नाशिकमधील

छत्तीसगडमधील बेकायदेशीर सामूहिक धर्मांतरास जन्मठेपेची शिक्षा

धर्मांतरविरोधी विधेयक मंजूर बळजबरी आणि प्रलोभनाद्वारे धर्मांतरासाठी कठोर दंडात्मक तरतुदी रायपूर : छत्तीसगड

केंद्र सरकारचा बेटिंग आणि जुगाराच्या अ‍ॅप्सवर स्ट्राईक

नवी दिल्ली : देशातील वाढत्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र