पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर राष्ट्रहिताच्या निर्णयांद्वारे दाखवायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना पुढील ३ दिवसांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ने हा निर्णय घेतला असून, त्यानुसार पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपर्यंतच वैध राहणार आहेत, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिलपर्यंत वैध असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.





विशेष म्हणजे, सार्क व्हिसा सूट योजनेअंतर्गत (SVES) भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही ७२ तासांच्या आत देश सोडावा लागणार आहे. याअंतर्गत कोणालाही भारतात परतण्याची किंवा थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही.


दरम्यान, जे भारतीय नागरिक सध्या पाकिस्तानात आहेत त्यांना तातडीने भारतात परतण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या निर्णयानंतर गुरुवारी (२४ एप्रिल) अनेक पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून मायदेशी परतत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.



भारत सरकारचा हा निर्णय केवळ सुरक्षा पावले उचलणं नव्हे, तर पाकिस्तानच्या दहशतवाद पुरस्कृत धोरणांना दिलेला स्पष्ट इशारा मानला जात आहे. आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर केंद्र सरकार कोणते आणखी कडक निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Ahmedabad Dosa Batter Death : डोसा पीठ प्रकरणात नवीन खुलासा, मुलींच्या मृत्यूपूर्वी आईने उंदीर नाशकाची केली होती खरेदी

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील चांदखेडामध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील २ चिमुकल्या बहिणींचा

Emergency Flight Landing : दुबईहून येणाऱ्या फ्लाइटचे लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग; १५४ प्रवासी सुरक्षित

लखनौ येथे आज म्हणजेच शनिवार ११ एप्रिल सकाळी दुबईहून काठमांडूकडे जाणाऱ्या फ्लाय दुबईच्या फ्लाइटचे (एफजेड-1133)

Voters : एसआयआरमध्ये देशभरात 6.08 कोटी मतदारांची नावे वगळली

नवी दिल्ली : विशेष गहन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेनंतर देशातील 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या

Mathura Accident : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू

मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात

Whatsapp Privacy : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीवर मोठा वाद; एलोन मस्क आणि टेलिग्रामचे सीईओकडून प्रश्न उपस्थित

मुंबई : सध्या व्हॉट्सॲप (WhatsApp) च्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीबाबत मोठा वाद समोर आला आहे. टेलिग्राम (Telegram) चे सीईओ

Justice Yashwant Verma : जस्टिस यशवंत वर्मांनी दिला राजीनामा, घरात सापडलेल्या जळालेल्या नोटा

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायमूर्ती वर्मा