RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले आहेत. त्यांच्याकडे एक चांगला फिनिशर नाही आहे जो संघाला शेवटच्या षटकात हाणामारी करून जिंकून देऊ शकतो. ध्रुव जुरेल व हेटमायर हे चांगले हिटर आहेत परंतु आवेश खानच्या यॉर्कर चेंडूंवर त्याना खेळता आले नाही. संजू सॅमसन आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही त्यामुळे राजस्थानला सलामीची चिंता तर असणारच.


वैभव सूर्यवंशी गेल्या सामन्यात चांगला खेळला आहे तो सलामीला खेळू शकतो. राजस्थानचा कर्णधार रियान परागला गोलंदाजीमध्ये खेळपट्टीप्रमाणे बदल करावे लागतील. मुळात २०-२० चा खेळ हा तुम्ही किती धोका पत्करता यावर तुमचा विजय अवलंबून असतो. जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल तर सुरुवातीची षटके फिरकीचा मारा करणे फायद्याचे ठरेल. बेंगळुरूचा संघ त्यांचा नैसर्गिक खेळ खेळेल, सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ केला आहे त्यामुळे आजही ते मैदानावर त्याच निर्धाराने उतरतील.


आयपीएलचा अठरावा हंगाम आता रंजक वळणावर आला असताना प्रत्येक संघाची विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सुध्दा आज विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. आज जर ते जिंकले नाहीत तर ते गुण तक्त्यात खालच्या स्थानावर घसरतील.


चला तर बघूया राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पैकी कोणता संघ बाजी मारतो.

Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव