मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले आहेत. त्यांच्याकडे एक चांगला फिनिशर नाही आहे जो संघाला शेवटच्या षटकात हाणामारी करून जिंकून देऊ शकतो. ध्रुव जुरेल व हेटमायर हे चांगले हिटर आहेत परंतु आवेश खानच्या यॉर्कर चेंडूंवर त्याना खेळता आले नाही. संजू सॅमसन आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही त्यामुळे राजस्थानला सलामीची चिंता तर असणारच.
वैभव सूर्यवंशी गेल्या सामन्यात चांगला खेळला आहे तो सलामीला खेळू शकतो. राजस्थानचा कर्णधार रियान परागला गोलंदाजीमध्ये खेळपट्टीप्रमाणे बदल करावे लागतील. मुळात २०-२० चा खेळ हा तुम्ही किती धोका पत्करता यावर तुमचा विजय अवलंबून असतो. जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल तर सुरुवातीची षटके फिरकीचा मारा करणे फायद्याचे ठरेल. बेंगळुरूचा संघ त्यांचा नैसर्गिक खेळ खेळेल, सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ केला आहे त्यामुळे आजही ते मैदानावर त्याच निर्धाराने उतरतील.
आयपीएलचा अठरावा हंगाम आता रंजक वळणावर आला असताना प्रत्येक संघाची विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सुध्दा आज विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. आज जर ते जिंकले नाहीत तर ते गुण तक्त्यात खालच्या स्थानावर घसरतील.
चला तर बघूया राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पैकी कोणता संघ बाजी मारतो.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…