RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले आहेत. त्यांच्याकडे एक चांगला फिनिशर नाही आहे जो संघाला शेवटच्या षटकात हाणामारी करून जिंकून देऊ शकतो. ध्रुव जुरेल व हेटमायर हे चांगले हिटर आहेत परंतु आवेश खानच्या यॉर्कर चेंडूंवर त्याना खेळता आले नाही. संजू सॅमसन आजच्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही त्यामुळे राजस्थानला सलामीची चिंता तर असणारच.


वैभव सूर्यवंशी गेल्या सामन्यात चांगला खेळला आहे तो सलामीला खेळू शकतो. राजस्थानचा कर्णधार रियान परागला गोलंदाजीमध्ये खेळपट्टीप्रमाणे बदल करावे लागतील. मुळात २०-२० चा खेळ हा तुम्ही किती धोका पत्करता यावर तुमचा विजय अवलंबून असतो. जर खेळपट्टी फिरकीला साथ देत असेल तर सुरुवातीची षटके फिरकीचा मारा करणे फायद्याचे ठरेल. बेंगळुरूचा संघ त्यांचा नैसर्गिक खेळ खेळेल, सुरुवातीपासूनच त्यांनी आक्रमक खेळ केला आहे त्यामुळे आजही ते मैदानावर त्याच निर्धाराने उतरतील.


आयपीएलचा अठरावा हंगाम आता रंजक वळणावर आला असताना प्रत्येक संघाची विजय मिळविण्यासाठी धडपड सुरु आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सुध्दा आज विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. आज जर ते जिंकले नाहीत तर ते गुण तक्त्यात खालच्या स्थानावर घसरतील.


चला तर बघूया राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पैकी कोणता संघ बाजी मारतो.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण