मोदी सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी - नाले - ओढे आहेत. यामुळे सीमा १०० टक्के सील करणे भारतासाठी कठीण आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने इस्रोच्या उपग्रहांची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे.



सध्या इस्रोचे ५५ उपग्रह विविध कामांत गुंतले आहेत. लवकरच लहान आकाराचे पण उच्च क्षमतेचे असे १०० ते १५० उपग्रह अंतराळात पाठवून केंद्र सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करणार आहे. यानंतर जर कोणी विना परवानगी पाकिस्तानमधून सागरी अथवा भू सीमा ओलांडून येत असेल तर उपग्रहामुळे जवळच्या सुरक्षा यंत्रणेला संदेश मिळेल. घुसखोरी नेमकी कोणत्या जागेवरुन होत आहे त्याची माहिती मिळेल. घुसखोरांचे लाईव्ह फूटेज उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा पथकांना तातडीने कारवाई करुन घुसखोरीला आळा घालणे शक्य होणार आहे.



केंद्र सरकार सीमेवरील बंदोबस्तासाठी उपग्रहांची मर्यादीत प्रमाणात मदत घेते. पण नव्या योजनेनुसार १०० ते १५० उपग्रह फक्त सागरी तसेच भू सीमा सील करणे आणि घुसखोरीला आळा घालणे यासाठीच वापरले जाणार आहेत. या उपग्रहांचे सीमावर्ती भागात इतर उपयोग पण केले जातील. पण सुरक्षेच्या कारणामुळे या संदर्भात सरकारी पातळीवरुन जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

भारताचा स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी

भारताने अलिकडेच अंतराळात स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगांना मिळणाऱ्या यशातूनच भविष्यात भारताला दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रहांना एकमेकांशी जोडणे अथवा अंतराळ स्थानकाची निर्मिती करणे हे शक्य होणार आहे. स्पेस डॉकींगची क्षमता अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या चार देशांकडेच आहे.
Comments
Add Comment

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात