मोदी सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

  61

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू सीमेवर अनेक ठिकाणी शेती, घनदाट जंगल, नदी - नाले - ओढे आहेत. यामुळे सीमा १०० टक्के सील करणे भारतासाठी कठीण आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने इस्रोच्या उपग्रहांची मदत घेण्याची तयारी सुरू केली आहे.



सध्या इस्रोचे ५५ उपग्रह विविध कामांत गुंतले आहेत. लवकरच लहान आकाराचे पण उच्च क्षमतेचे असे १०० ते १५० उपग्रह अंतराळात पाठवून केंद्र सरकार भारत - पाकिस्तान सीमा सील करणार आहे. यानंतर जर कोणी विना परवानगी पाकिस्तानमधून सागरी अथवा भू सीमा ओलांडून येत असेल तर उपग्रहामुळे जवळच्या सुरक्षा यंत्रणेला संदेश मिळेल. घुसखोरी नेमकी कोणत्या जागेवरुन होत आहे त्याची माहिती मिळेल. घुसखोरांचे लाईव्ह फूटेज उपलब्ध होईल. यामुळे सुरक्षा पथकांना तातडीने कारवाई करुन घुसखोरीला आळा घालणे शक्य होणार आहे.



केंद्र सरकार सीमेवरील बंदोबस्तासाठी उपग्रहांची मर्यादीत प्रमाणात मदत घेते. पण नव्या योजनेनुसार १०० ते १५० उपग्रह फक्त सागरी तसेच भू सीमा सील करणे आणि घुसखोरीला आळा घालणे यासाठीच वापरले जाणार आहेत. या उपग्रहांचे सीमावर्ती भागात इतर उपयोग पण केले जातील. पण सुरक्षेच्या कारणामुळे या संदर्भात सरकारी पातळीवरुन जास्त माहिती देण्यात आलेली नाही.

भारताचा स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी

भारताने अलिकडेच अंतराळात स्पेस डॉकिंगचा सलग दुसरा प्रयोग यशस्वी केला. या प्रयोगांना मिळणाऱ्या यशातूनच भविष्यात भारताला दोन किंवा त्यापेक्षा जास्त उपग्रहांना एकमेकांशी जोडणे अथवा अंतराळ स्थानकाची निर्मिती करणे हे शक्य होणार आहे. स्पेस डॉकींगची क्षमता अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या चार देशांकडेच आहे.
Comments
Add Comment

भारतात तयार होणार राफेल लढाऊ विमानाचे सुटे भाग

नवी दिल्ली : राफेल उत्पादक दसॉल्ट एव्हिएशनने भारत आणि इतर जागतिक बाजारपेठांसाठी लढाऊ विमानांचे सुटे भाग तयार

शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात

RCB Victory Parade : RCBच्या विजयोत्सवात ११ मृत्युमुखी, चूक कुणाची?

मुख्यमंत्री सिद्धरमय्या काय बरळले ? बंगळुरू : बंगळुरूमधलं आनंदाचं वातावरण काही क्षणातच शोकांतिकेत बदललं. रॉयल

बंगळुरूतील चेंगराचेंगरीत 'या' अकरा जणांचा मृत्यू

बंगळुरू : आयपीएल २०२५ जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या विजयानिमित्त बंगळुरूत कर्नाटक सरकारने विजयी

सिक्कीम भूस्खलन : भारतीय लष्कराने ११३ पर्यटकांचा वाचवला जीव

गंगटोक : सिक्कीममधील पूर्णपणे संपर्क तुटलेल्या लाचेन गावापर्यंत पोहचण्यासाठी भारतीय लष्कराने अत्यंत खराब

देशात कोरोनाचे २७६ नवे रुग्ण,७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासात २७६ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतात