उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा त्यांनाही बसतातच. त्यामुळे उन्हामुळे झाडं सुकून जातात. अशा वेळी झाडांना ताजंतवानं कसं ठेवायचं हे जाणून घेऊया या लेखातून…
उन्हाळ्यात माती लवकर वाळते, त्यामुळे झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही. उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे पानं आणि खोडंही सुकतात. अशा वेळी मातीत जास्तीत जास्त ओलावा राहील याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी झाडांना पाणी नेहमी पहाटे किंवा ऊन उतरल्यानंतर घाला. त्यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो. चहा उकळल्यानंतर त्यात राहणारा चहाचा चोथाही आधी स्वच्छ धुऊन मग तो चुरावा आणि पाण्यासोबत झाडांना घालावा.. त्यामुळे मुळांना थंडावा राहतो.
उन्हाळ्यात झाडांना कोरडी खतं शक्यतो घालू नका कारण, त्यामुळे उष्णता वाढते. त्या ऐवजी कांदा, केळं किंवा बटाट्याची सालं तीन दिवस हवाबंद डब्यात पाणी घालून ठेवा आणि तीन दिवसानंतर त्यात पाणी वाढवून ते झाडांना घाला. त्यामुळे मुळांना फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम मिळतं. आठवड्यातून एकदा हळद मिसळलेलं पाणी झाडांना घाला. त्यामुळे मुळांना झालेली दुखापत किंवा मातीतली कीड नष्ट होते. खूप ऊन असेल तर पातळ पंचा किंवा टॉवेल ओला करून तो झाडांवर सावली येईल असा लावा. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त बसणार नाही. तर तुम्हीसुद्धा अशाप्रकारे तुमच्या घरातल्या झाडांना असं ताजंतवानं नक्की ठेऊ शकता.
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना राजस्थान रॉयल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने पाकिस्तान संबंधित राजकीय, आर्थिक आणि राजनैतिक आघाड्यांवर काही…
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…