Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!

  42

उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा त्यांनाही बसतातच. त्यामुळे उन्हामुळे झाडं सुकून जातात. अशा वेळी झाडांना ताजंतवानं कसं ठेवायचं हे जाणून घेऊया या लेखातून...


?si=NP81BEMkhncPcPzs


उन्हाळ्यात माती लवकर वाळते, त्यामुळे झाडांना पुरेसं पाणी मिळत नाही. उन्हात जास्त वेळ राहिल्यामुळे पानं आणि खोडंही सुकतात. अशा वेळी मातीत जास्तीत जास्त ओलावा राहील याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी झाडांना पाणी नेहमी पहाटे किंवा ऊन उतरल्यानंतर घाला. त्यामुळे मातीत ओलावा टिकून राहतो. चहा उकळल्यानंतर त्यात राहणारा चहाचा चोथाही आधी स्वच्छ धुऊन मग तो चुरावा आणि पाण्यासोबत झाडांना घालावा.. त्यामुळे मुळांना थंडावा राहतो.



उन्हाळ्यात झाडांना कोरडी खतं शक्यतो घालू नका कारण, त्यामुळे उष्णता वाढते. त्या ऐवजी कांदा, केळं किंवा बटाट्याची सालं तीन दिवस हवाबंद डब्यात पाणी घालून ठेवा आणि तीन दिवसानंतर त्यात पाणी वाढवून ते झाडांना घाला. त्यामुळे मुळांना फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम मिळतं. आठवड्यातून एकदा हळद मिसळलेलं पाणी झाडांना घाला. त्यामुळे मुळांना झालेली दुखापत किंवा मातीतली कीड नष्ट होते. खूप ऊन असेल तर पातळ पंचा किंवा टॉवेल ओला करून तो झाडांवर सावली येईल असा लावा. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त बसणार नाही. तर तुम्हीसुद्धा अशाप्रकारे तुमच्या घरातल्या झाडांना असं ताजंतवानं नक्की ठेऊ शकता.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर