अतिरेक्यांची माहिती द्या, वीस लाख रुपये मिळवा

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम अतिरेकी हल्ल्याशी संबंधित तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. यानंतर माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल; असे जम्मू काश्मीर पोलिसांनी जाहीर केले आहे. ही जाहिरात जम्मू काश्मीर पोलिसांच्यावतीने अनंतनाग पोलीस ठाण्याने प्रसिद्ध केली आहे.





पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. अतिरेक्यांविषयी ठोस माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल



अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांच्या कलाकाराने रेखाचित्र काढली आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेली माहिती आणि पोलीस चौकशीतून हाती आलेली माहिती याची पडताळणी करुन पोलिसांनी तीन अतिरेक्यांची रेखाचित्र त्यांच्या नाव आणि पत्त्यासह प्रसिद्ध केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), अली भाई उर्फ तल्हा भाई, हाशिम मुसा उर्फ सुलेमान या तीन अतिरेक्यांची रेखाचित्र प्रसिद्ध केली आहेत.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे