काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मारले गेल्यामुळे जम्मू काश्मीरमधील इतर पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पर्यटक शक्य तितक्या लवकर काश्मीरमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता विशेष गाडी सोडणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार, ०४६१२ ही श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली ही विशेष गाडी बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता सुटणार आहे. गाडी रात्री ९.२० वाजता जम्मूतील कटरा रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे. ही गाडी गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कटरा ते नवी दिल्ली या प्रवासात ही विशेष गाडी जम्मू तवी, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, धांडारी कलान, अंबाला कॅन्टोन्मेंट, कुरुक्षेत्र जंक्शन, पानिपत या स्थानकांवर थांबणार आहे.

रेल्वेची दिल्ली ते काश्मीर दरम्यानची सामान्य वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. ०४६१२ ही विशेष गाडी फक्त एक दिवसापुरतीच धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात