काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मारले गेल्यामुळे जम्मू काश्मीरमधील इतर पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पर्यटक शक्य तितक्या लवकर काश्मीरमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता विशेष गाडी सोडणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार, ०४६१२ ही श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली ही विशेष गाडी बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता सुटणार आहे. गाडी रात्री ९.२० वाजता जम्मूतील कटरा रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे. ही गाडी गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कटरा ते नवी दिल्ली या प्रवासात ही विशेष गाडी जम्मू तवी, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, धांडारी कलान, अंबाला कॅन्टोन्मेंट, कुरुक्षेत्र जंक्शन, पानिपत या स्थानकांवर थांबणार आहे.

रेल्वेची दिल्ली ते काश्मीर दरम्यानची सामान्य वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. ०४६१२ ही विशेष गाडी फक्त एक दिवसापुरतीच धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने