काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक मारले गेल्यामुळे जम्मू काश्मीरमधील इतर पर्यटकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पर्यटक शक्य तितक्या लवकर काश्मीरमधून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासन बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता विशेष गाडी सोडणार आहे.

रेल्वे प्रशासनाने केलेल्या घोषणेनुसार, ०४६१२ ही श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली ही विशेष गाडी बुधवार २३ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९.२० वाजता सुटणार आहे. गाडी रात्री ९.२० वाजता जम्मूतील कटरा रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे. ही गाडी गुरुवार २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. कटरा ते नवी दिल्ली या प्रवासात ही विशेष गाडी जम्मू तवी, पठाणकोट कॅन्टोन्मेंट, धांडारी कलान, अंबाला कॅन्टोन्मेंट, कुरुक्षेत्र जंक्शन, पानिपत या स्थानकांवर थांबणार आहे.

रेल्वेची दिल्ली ते काश्मीर दरम्यानची सामान्य वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. ०४६१२ ही विशेष गाडी फक्त एक दिवसापुरतीच धावणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
Comments
Add Comment

फ्लाइट टिकट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली