IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब...पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र या सामन्यात खेळाडू आणि अंपायर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. खरंतर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा बदल पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी देण्यात आला. या सामन्यात टॉस जिंकत हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.



केले हे ४ मोठे बदल


या सामन्यात बीसीसीआयकडून चार मोठे बदल करण्यात आले. पहिला हा की या सामन्यादरम्यान खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील पिडीतांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतून हाताला काळी पट्टी बांधतील. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दु:ख झाले आहे.


 


दुसरी बाब म्हणजे हा सामना सुरू करण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगण्यात आले. तिसरी बाब म्हणजे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये या सामन्यात चीअरलीडर्स असणार नाहीत. तर चौथी बाब म्हणजे या सामन्यात कोणत्याही प्रकारची आतषबाजी होणार नाही.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या