IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब...पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र या सामन्यात खेळाडू आणि अंपायर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. खरंतर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा बदल पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी देण्यात आला. या सामन्यात टॉस जिंकत हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.



केले हे ४ मोठे बदल


या सामन्यात बीसीसीआयकडून चार मोठे बदल करण्यात आले. पहिला हा की या सामन्यादरम्यान खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील पिडीतांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतून हाताला काळी पट्टी बांधतील. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दु:ख झाले आहे.


 


दुसरी बाब म्हणजे हा सामना सुरू करण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगण्यात आले. तिसरी बाब म्हणजे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये या सामन्यात चीअरलीडर्स असणार नाहीत. तर चौथी बाब म्हणजे या सामन्यात कोणत्याही प्रकारची आतषबाजी होणार नाही.

Comments
Add Comment

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतल्या श्रीलंका विरुद्ध

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना