IPL सामन्यात काळी पट्टी बांधून उतरले खेळाडू, चिअरलीडर्स गायब...पहलगाम हल्ल्यानंतर झाले हे बदल

  135

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र या सामन्यात खेळाडू आणि अंपायर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. खरंतर, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. हा बदल पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यासाठी देण्यात आला. या सामन्यात टॉस जिंकत हार्दिक पांड्याने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.



केले हे ४ मोठे बदल


या सामन्यात बीसीसीआयकडून चार मोठे बदल करण्यात आले. पहिला हा की या सामन्यादरम्यान खेळाडू आणि अंपायर पहलगाम हल्ल्यातील पिडीतांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतून हाताला काळी पट्टी बांधतील. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दु:ख झाले आहे.


 


दुसरी बाब म्हणजे हा सामना सुरू करण्याआधी एक मिनिटांचे मौन बाळगण्यात आले. तिसरी बाब म्हणजे हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये या सामन्यात चीअरलीडर्स असणार नाहीत. तर चौथी बाब म्हणजे या सामन्यात कोणत्याही प्रकारची आतषबाजी होणार नाही.

Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब