Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा चालू आहे. ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांनी "देशप्रेमापेक्षा चित्रपट महत्त्वाचा नाही" असे म्हणत चित्रपट निर्मात्यांवर आणि कलाकारांवर टीका केली आहे.

सध्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा किंवा कोणतीही प्रतिक्रिया निर्मात्यांकडून आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिम पाहता निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रचारात अडचणी येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या वादावर चित्रपट टीमकडून स्पष्टीकरण येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



 

पहलगाम येथील हल्ल्यात जवानांना लक्ष्य केल्याने देशभरात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान दिले जात असल्याचे अनेकांना खटकले आहे.अनेकांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाकडे अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काहींनी असेही नमूद केले आहे की, जर बॉलिवूडला राष्ट्रहित जपायचे असेल, तर पाकिस्तानी कलाकारांनवर बंदी घातलीच पाहिजे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत