मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय मिळवला आहे. हा सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियममध्ये रंगला होता.या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षऱ पटेलने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऋषभ पंतच्या लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान ८ विकेट्स राहत सहज पूर्ण केले.
१६० धावांचे प्रत्युत्तर देण्यासाटी उतरलेल्या दिल्लीची सुरूवात चांगली राहिली नाही. चौथ्या षटकांत करुण नायरने आपली विकेट गमावली. मार्करमने त्याची विकेट घेतली. यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेलने शानदार फलंदाजी केली. दोघेही चांगल्या लयीमध्ये दिसले. पोरेलने ३२ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. १२व्या षटकांत त्याची विकेट पडली. मात्र एका बाजूला के एल राहुल टिकून होता. त्याने ४० बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. पोरेलची विकेट पडल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षऱनेही तुफानी फलंदाजी केली. याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने लखनऊला ८ विकेटनी हरवले.
टॉरसनंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या लखनऊची सुरूवात शानदार राहिली. एडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी तुफानी सुरूवात केली. दोघांनी शानदार शॉट्स मारले. मार्करमने ३० बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. दोन्ही फलंदाजांनी १० षटकांत ९० धावा ठोकल्या. मात्र मार्करमने आपली विकेट गमावली. त्याने आपल्या खेळीदरम्यान २ चौकार आणि ३ षटकार ठोकले.
यानंतर आयपीएललमध्ये धमाकेदार कामगिरी करणारा निकोलस पूरन मैदानात पोहोचला. त्याने कुलदीपला चौकारही ठोकला. मात्र १२व्या षटकांत स्टार्कने त्याला बाद केले. पूरनने केवळ ९ धावा केल्या. यानंतर अब्दुल समदही १२ धावा करून बाद झाला. याच षटकांत मुकेश कुमारने मिचेल मार्शलाही बाद केले. मार्शने ४५ धावा केल्या.
एकवेळेस लखनऊचा संघ १० षटकांत एक बाद ९० धावांवर होता. मात्र पुढील १० षटकांत लखनऊ संघाने केवळ ७० धावाच केल्या मात्र ५ विकेट गमावल्या.२७ कोटींना विकत घेतलेला कर्णधार ऋषभ पंत केवळ दोन बॉल खेळण्यासाठी आला. मात्र त्याला खातेही खोलता आले नाही.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…