Curd: दह्यासोबत या गोष्टी खाल्या तर, पोटात विष तयार होईल!

  84

मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण काही लोकांना हे माहित नाही आहे कि दह्यासोबत कोणते पदार्थ खावे आणि कोणते नाही. उन्हाळ्यात जेवणासोबत रायता खायला एक वेगळाच आनंद मिळतो. आणि त्याचसोबत शरीरसुद्धा थंड राहते.रायता हा देखील फायदेशीर असतो त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात काही लोक नाश्त्यात पराठ्यासोबत दही खातात. आणि काही लोक दह्याची लस्सी बनवतात आणि पितात.

दह्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी यासह अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. दह्यासोबत काही गोष्टींचे मिश्रण करू नये. बरेच लोक कांद्याचा रायता बनवतात आणि खातात आणि बरेच लोक कच्च्या कांद्याच्या सॅलडमध्ये दही मिसळून खातात. कच्चा कांदा दह्यासोबत अजिबात खाऊ नका कारण कांद्याचे स्वरूप उष्ण असते आणि रायतेचे स्वरूप थंड असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी होऊ शकत.



अनेकदा लोक वजन वाढवण्यासाठी दही आणि केळी एकत्र खातात. बरेच लोक फळांच्या रायत्यामध्ये दही, केळी आणि इतर फळे देखील वापरतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की दह्यासोबत केळी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला केळी खाल्ल्यानंतर दही खायचे असेल तर ते कमीत कमी २ तासांनी खा.

दूध कधीही दह्यासोबत सेवन करू नये. आयुर्वेदात या दोन्हींचे एकत्र चुकीचे मानले जाते. खरं तर, दही हलके आणि पचायला सोपे असते. तर, दूध जड आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा हे दोन्ही एकत्र सेवन केले जाते तेव्हा दूध दह्याचे पचन मंदावते. यामुळे तुम्हाला गॅस, आम्लता, पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर