Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच अन्य पदार्थांसाठी रेफ्रिजरेटरचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पण, याच्या वाढत्या वापराबरोबरच त्याची योग्य काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी फ्रिज वेळोवेळी साफ करण्याबरोबरच तो कुठे आणि भिंतीच्या किती अंतरावर ठेवायला हवा? हे माहित असणं देखील गरजेचं आहे.


आजच्या काळात प्रत्येकांच्या घरात रेफ्रिजरेटर हा पाहायला मिळतोच. अन्न पदार्थ बराच काळ टिकून राहण्यासाठी तसेच त्यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का, कि रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या या इलेक्ट्रॉनिक उपकरणाची जर योग्य काळजी घेतली नाही, तर त्यामुळे मोठे नुकसान देखील होऊ शकते?


आपल्यापैकी ९०% लोकांच्या घरी फ्रिज हा भिंतीला चिकटून असतो. जे योग्य नाही. यामुळे वीज बिल तर वाढतेच पण याबरोबरच फ्रिज गरम होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे रेफ्रिजरेटर भिंतीपासून किती अंतरावर ठेवावा?  हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.



फ्रिज भिंतीपासून अंतरावर असणे का गरजेच?



फ्रिज जर भिंतीला चिटकून असेल. रेफ्रिजरेटरला आतील भाग थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. या प्रक्रियेदरम्यान मागील ग्रिलमधून उष्णता सोडली जाते. भिंतीला चिटकून ठेवला तर फ्रिज लवकर गरम होतो. त्याची काम करण्याची क्षमताही मंदावते तसेच थंड होण्यासाठी तो जास्त वेळ घेतो ज्यामुळे वीज बिल वाढतं.



फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?



रेफ्रिजरेटर मागील भिंतींपासून आणि, वरच्या कॅबिनेटपासून 1 इंच अंतरावर आणि दोन्ही बाजूंनी किमान 1/4 इंच अंतरावर असायला हवा. रेफ्रिजरेटर भिंतीपासून दूर ठेवण्याव्यतिरिक्त, तोहीटर किंवा इतर उष्णता स्त्रोतापासून देखील दूर ठेवणे महत्वाचे आहे.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी