KDMC News : कल्याण - टिटवाळा भागात उद्या पाणी येणार नाही; दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवा!

  86

कल्याण : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणून कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा उद्या (दि २२) बंद राहणार आहे.



कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि २२) कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या अशुध्द आणि शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम उद्या (दि २२) करण्यात येणार आहे.


या कामासाठी नऊ तासाचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन कल्याण महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील - अमित शाह

हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी! नवी दिल्ली : हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का

लंडन: लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला होता. आता दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या भारतीय

Bangluru News : बंगळूरूत रील बनवता बनवता तोल गेला अन्... थेट १३व्या मजल्यावरून खाली

२० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू बंगळूरू : बंगळुरूमध्ये रील बनवताना एका २० वर्षीय तरुणीचा बांधकाम सुरू असलेल्या

Pandharpur Wari 2025 : वारकऱ्यांची आरोग्यसेवा कोण करतं?

महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या