ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजठाणे

KDMC News : कल्याण - टिटवाळा भागात उद्या पाणी येणार नाही; दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवा!

  62

कल्याण : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. म्हणून कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा उद्या (दि २२) बंद राहणार आहे.



कल्याण डोंबिवली महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (दि २२) कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदीवरील मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या अशुध्द आणि शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिन्यांवर प्रवाह मोजणी मीटर बसविण्याचे काम उद्या (दि २२) करण्यात येणार आहे.


या कामासाठी नऊ तासाचा कालावधी लागणार असल्याने या जलवाहिन्यांवरून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण, टिटवाळा परिसराचा पाणी पुरवठा सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद राहणार आहे, मंगळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता विचारात घेऊन नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळा, असे आवाहन कल्याण महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Stock Market Analysis: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: एका सत्राअखेरीस गुंतवणूकदारांची २ लाख कोटींची कमाई

मोहित सोमण: सकाळचा वेग इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने कायम राखल्याने अखेरचे सत्र संपताना शेअर बाजारात किंचित

Shriram Group - श्रीराम एएमसीमध्ये गुंतवणूक करून सॅनलमने भारतीय मालमत्ता व्यवस्थापन बाजारात केला प्रवेश

मुंबई: श्रीराम ग्रुपची सहकंपनी श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Shriram AMC) कंपनीने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात

Samruddhi Expressway : समृद्धीचा नवा अध्याय... नागपूर ते मुंबई, आता फक्त आठ तासांत"

नागपूर : मुंबई समुद्धी महामार्ग हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न. अनंत अडचणींवर मात करत समृद्धी