KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

  228

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कैपिटल संघाचा सात बळीनी पराभव केला. सलामीला कर्णधार शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर जॉस बटलरने सामन्यावर जी पक्कड घेतली ती अप्रतिमच होती.


आजच्या सामन्यात गुजरातला फिरकीचा सामना करावा लागणार आहे. सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे दोन्ही गोलंदाज गुजरातच्या फलंदाजाना रोखू शकतात. अगोदरच्या सामन्यात या दोघांनी पंजाबच्या फलंदाजाना १११ रोखण्याचा पराक्रम केला, परंतु त्यांना तो सामना जिंकता आला नाही. आजचा सामना जिंकायचा असेल तर कोलकत्ताला फलंदाजीवर भर द्यावा लागेल.


कोलकत्त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य नसल्यामुळे हा संघ अडचणीत येतो. एकही फलंदाज सातत्याने खेळतो असे दिसत नाही. कोलकत्ताचे हिटर फलंदाज आंद्रे रसेल व व्यंकटेश अय्यर संघासाठी पूर्ण जबाबदारीने खेळत नाही आहेत. आजचा सामना जिंकायचा असेल तर या दोघानाही पूर्ण ताकदीने खेळावे लागेल. गुजरातची फिरकी इडन गार्डनवर काय पराक्रम करते हे पाहणेही महत्वाचे आहे. चला तर बघूया घरच्या मैदानावर कोलकत्ता गुजरातला रोखते का?

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र