Summer Health Update : उष्मघाताने आजारी पडत असाल तर 'ही' माहिती नक्की वाचा

मुंबई : महाराष्ट्रातील वाढता उकाडा पाहता उन्हाळ्यात सगळ्यात जास्त होणारा त्रास म्हणजे उष्णतेचा त्रास. शरीराचं तापमान वाढतं, थकवा, डोकेदुखी, चक्कर, उलट्या असे अनेक त्रास होतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर हीट स्ट्रोक म्हणजे उष्माघात होऊ शकतो.



शरीरात जास्त उष्णतेचा त्रास ओळखण्याची काही ठळक लक्षणं आहेत. जास्त घाम येणे, अशक्तपणा आणि थकवा, चक्कर येणे आणि मळमळ, डोकेदुखी, उलट्या, शरीराचे तापमान वाढणं, हात, पाय आणि पोटात असह्य पेटके येणं ही काही सामान्य लक्षणं आहेत. काहींना पायावर सूज येऊ शकते तर काहींना श्वास घ्यायला त्रासही होऊ शकतो. जर ही लक्षण दिसत असतील तर वैद्यकीय मदत तर घ्याच पण काही प्रथमोपचार नक्की करा..



सर्वप्रथम कपडे घामाने भिजलेले असतील तर ते ताबडतोब बदला. शरीरावर गार पाणी ओतून शरीर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर शक्यतो सुती किंवा मलमलचे कपडे वापरा. रूम टेंपरेचरवर असलेलं पाणी प्या, कारण त्याने तहान भागते. थकवा जाणवत असेल तर साखर-मीठ टाकून पाणी प्या. शक्य असल्यास लिंबू अथवा कोकम सरबत प्या. शांत आणि थंड वातावरणात विश्रांती घ्या. जेणेकरून तुमची एनर्जी टिकून राहील.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,

कांदिवलीत उंच इमारतीला आग; आठ जणांना वाचवले

मुंबई : रविवारी सकाळी कांदिवली (पश्चिम) येथील अग्रवाल रेसिडेन्सी या उंच इमारतीत लागलेल्या आगीने परिसरात खळबळ

MPSC 2026 चे वेळापत्रक जाहीर, सविस्तर वाचा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर