Summer Health Update : उष्मघाताने आजारी पडत असाल तर 'ही' माहिती नक्की वाचा

मुंबई : महाराष्ट्रातील वाढता उकाडा पाहता उन्हाळ्यात सगळ्यात जास्त होणारा त्रास म्हणजे उष्णतेचा त्रास. शरीराचं तापमान वाढतं, थकवा, डोकेदुखी, चक्कर, उलट्या असे अनेक त्रास होतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर हीट स्ट्रोक म्हणजे उष्माघात होऊ शकतो.



शरीरात जास्त उष्णतेचा त्रास ओळखण्याची काही ठळक लक्षणं आहेत. जास्त घाम येणे, अशक्तपणा आणि थकवा, चक्कर येणे आणि मळमळ, डोकेदुखी, उलट्या, शरीराचे तापमान वाढणं, हात, पाय आणि पोटात असह्य पेटके येणं ही काही सामान्य लक्षणं आहेत. काहींना पायावर सूज येऊ शकते तर काहींना श्वास घ्यायला त्रासही होऊ शकतो. जर ही लक्षण दिसत असतील तर वैद्यकीय मदत तर घ्याच पण काही प्रथमोपचार नक्की करा..



सर्वप्रथम कपडे घामाने भिजलेले असतील तर ते ताबडतोब बदला. शरीरावर गार पाणी ओतून शरीर स्वच्छ करून घ्या. त्यानंतर शक्यतो सुती किंवा मलमलचे कपडे वापरा. रूम टेंपरेचरवर असलेलं पाणी प्या, कारण त्याने तहान भागते. थकवा जाणवत असेल तर साखर-मीठ टाकून पाणी प्या. शक्य असल्यास लिंबू अथवा कोकम सरबत प्या. शांत आणि थंड वातावरणात विश्रांती घ्या. जेणेकरून तुमची एनर्जी टिकून राहील.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.