क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या चार क्रिकेटपटूंना ए+ श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल सात कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत या सहा क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ए श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



बीसीसीआयने १९ खेळाडूंना सी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल. सी श्रेणीतील खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्ण, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

करारबद्ध खेळाडूंना वर्षभरात भारतासाठी किमान तीन कसोटी सामने, आठ एकदिवसीय सामने आणि १० T20 सामने खेळणे बंधनकारक आहे.
Comments
Add Comment

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि

भारत पाकिस्तान सामन्यावेळी हस्तांदोलन झाले की नाही ?

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्याच्या