क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या चार क्रिकेटपटूंना ए+ श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल सात कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत या सहा क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ए श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



बीसीसीआयने १९ खेळाडूंना सी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल. सी श्रेणीतील खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्ण, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

करारबद्ध खेळाडूंना वर्षभरात भारतासाठी किमान तीन कसोटी सामने, आठ एकदिवसीय सामने आणि १० T20 सामने खेळणे बंधनकारक आहे.
Comments
Add Comment

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच