क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या चार क्रिकेटपटूंना ए+ श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल सात कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत या सहा क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ए श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



बीसीसीआयने १९ खेळाडूंना सी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल. सी श्रेणीतील खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्ण, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

करारबद्ध खेळाडूंना वर्षभरात भारतासाठी किमान तीन कसोटी सामने, आठ एकदिवसीय सामने आणि १० T20 सामने खेळणे बंधनकारक आहे.
Comments
Add Comment

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

IND vs PAK : पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज

मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर

भारताची बॉक्सर जॅस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक, रचला इतिहास

नवी दिल्ली: भारताची प्रतिभावान बॉक्सर जैस्मिन लंबोरियाने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५

BCCI च्या कुटुंबातील कोणीही मेलं नाही, म्हणून..., शुभम द्विवेदीच्या पत्नीची प्रतिक्रिया

"सामान्य लोक माझं ऐकतील आणि सामन्यावर बहिष्कार टाकतील" ऐशन्या द्विवेदी Asia Cup 2025 India Vs Pak Match Controversy: पहलगाम हल्ल्यात