क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

  107

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा या चार क्रिकेटपटूंना ए+ श्रेणीत करारबद्ध करण्यात आले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल सात कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी, रिषभ पंत या सहा क्रिकेटपटूंना बीसीसीआयने ए श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल पाच कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंना बीसीसीआयने बी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल तीन कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल.



बीसीसीआयने १९ खेळाडूंना सी श्रेणीत करारबद्ध केले आहे. या खेळाडूंना वर्षाला कमाल एक कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळणार आहे. पण या उत्पन्नासाठी करारातील कलमांचे पालन करुन भारतासाठी खेळणे या खेळाडूंना बंधनकारक असेल. सी श्रेणीतील खेळाडूंमध्ये रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्ण, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सरफराज खान, नितीश कुमार रेड्डी, ईशान किशन, अभिषेक शर्मा, आकाशदीप, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा यांचा समावेश आहे.

करारबद्ध खेळाडूंना वर्षभरात भारतासाठी किमान तीन कसोटी सामने, आठ एकदिवसीय सामने आणि १० T20 सामने खेळणे बंधनकारक आहे.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र