अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक


ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची मादी पालिका प्रशासन जाहीर करते. त्यानुसार पालिका क्षेत्रात ९६ इमारती अतिधोकादायक असून, चार हजार ४०७ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.


पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, बासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सी-१, सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण केले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत असून, त्या इमारती खाली करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. त्यातील २५ इमारती या आजघडीला व्याप्त आहेत.


तसेच १५ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली असून, १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढलेले आहे. आता ज्या इमारती अतिधोकादायक असूनही रिकाम्या केलेल्या नाहीत अशा इमारतधारकांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. येथील इमारतधारकांनी पर्यायी व्यवस्था पाहावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये चार हजार ४०७इमारतीचा समावेश आहे. मागील वषपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली आहे.

Comments
Add Comment

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन

आधी मतांसाठी सोनं वाटलं, पराभवानंतर धमकी देत.... अन त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ

नाशिक : निवडणुकीपूर्वी ‘कुबेर’ बनून मतदारांवर सोन्याची बरसात करणारा उमेदवार, पराभवानंतर मात्र मतदारांच्या

कोरेगाव भीमा विजयी दिनानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल; कोणते पर्यायी मार्ग वापरावेत?

पुणे: कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला लाखो अनुयायी पुण्यात येत असतात.