अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक


ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची मादी पालिका प्रशासन जाहीर करते. त्यानुसार पालिका क्षेत्रात ९६ इमारती अतिधोकादायक असून, चार हजार ४०७ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.


पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, बासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सी-१, सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण केले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत असून, त्या इमारती खाली करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. त्यातील २५ इमारती या आजघडीला व्याप्त आहेत.


तसेच १५ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली असून, १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढलेले आहे. आता ज्या इमारती अतिधोकादायक असूनही रिकाम्या केलेल्या नाहीत अशा इमारतधारकांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. येथील इमारतधारकांनी पर्यायी व्यवस्था पाहावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये चार हजार ४०७इमारतीचा समावेश आहे. मागील वषपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा