Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले...

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी निघाले होते. परंतु, दिल्लीत विमानांची गर्दी असल्यामुळे त्यांचे विमान राजस्थानच्या जयपूर येथे लँड करावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्दुल्लांनी रात्री १ वाजता ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.



जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला शनिवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा १ वाजता विमान पोहचले.





विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. "दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. जम्मूहून निघाल्यानंतर ३ तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवलें. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही." असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे ६ विमाने रद्द करण्यात आली होती. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे विमानांच्या उड्डानांना विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी