नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी निघाले होते. परंतु, दिल्लीत विमानांची गर्दी असल्यामुळे त्यांचे विमान राजस्थानच्या जयपूर येथे लँड करावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्दुल्लांनी रात्री १ वाजता ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मे महिन्यातील ९ तारखेला ...
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला शनिवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा १ वाजता विमान पोहचले.
विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. "दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. जम्मूहून निघाल्यानंतर ३ तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवलें. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही." असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे ६ विमाने रद्द करण्यात आली होती. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे विमानांच्या उड्डानांना विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती.