वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेला. ही घटना वानखेडे स्टेडियममध्येच घडली.



मुख्य न्यायदंडाधिकारी सहकुटुंब क्रिकेट सामना बघण्यासाठी आले होते. सर्वजण खेळाचा आनंद लुटत होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.



आयपीएलमध्ये बेटिंग, एकाला अटक

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तज्ज्ञ मोबाईलची तपासणी करत आहेत आणि पोलीस अटकेतील व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा ११ ने ही कारवाई केली आहे. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग खेळत होता.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : वर्ष २०३०-३१ पर्यंत नवीन फार्मसी अभ्यासक्रमांना स्थगिती

मुख्यमंत्र्यांचा निर्णय; सिंधुदुर्गमध्ये 'हॉटेल मॅनेजमेंट'ला मान्यता, दुर्गम भागात १७ नवीन व्यावसायिक

विदर्भासाठी ५५० कि.मी.च्या चार महामार्गांना मंजुरी

पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय; दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई :

स्पर्धा परीक्षेत सवलत घेतल्यास 'खुल्या' प्रवर्गातील दावा अमान्य

राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न मुंबई : सरकारी

Maharashtra Investment : राज्यात १.१४ लाख कोटींची नवी गुंतवणूक

८ हजार रोजगार निर्माण होणार; उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार मुंबई : राज्याच्या

राज्यात ३० जूनपासून मतदार याद्यांच्या शुद्धीकरणाचा 'श्रीगणेशा'

 'एसआयआर' मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर; ७ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार मुंबई : लोकशाहीचे अविभाज्य अंग

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'काटकसरी'च्या आवाहनाला