वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेला. ही घटना वानखेडे स्टेडियममध्येच घडली.



मुख्य न्यायदंडाधिकारी सहकुटुंब क्रिकेट सामना बघण्यासाठी आले होते. सर्वजण खेळाचा आनंद लुटत होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.



आयपीएलमध्ये बेटिंग, एकाला अटक

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तज्ज्ञ मोबाईलची तपासणी करत आहेत आणि पोलीस अटकेतील व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा ११ ने ही कारवाई केली आहे. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग खेळत होता.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत