वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेला. ही घटना वानखेडे स्टेडियममध्येच घडली.



मुख्य न्यायदंडाधिकारी सहकुटुंब क्रिकेट सामना बघण्यासाठी आले होते. सर्वजण खेळाचा आनंद लुटत होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.



आयपीएलमध्ये बेटिंग, एकाला अटक

आयपीएलमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तज्ज्ञ मोबाईलची तपासणी करत आहेत आणि पोलीस अटकेतील व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा ११ ने ही कारवाई केली आहे. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग खेळत होता.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण