Beed : बीडचा पाणी प्रश्न सोडवणार, गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करुन पर्यटनाला चालना देण्याचे आश्वासन दिले. ते बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंचावर मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे मंचावर उपस्थित होते.



नव्या वर्षात आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर काही आरोप केले. यानंतर नाराजी व्यक्त करत धस यांची राष्ट्रीय नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बीडमध्ये गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर दिसले.



पंकजा मुंडे आणि विठ्ठल महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना गहिनीनाथ गड दत्तक घेण्याचे तसेच गडावर लोकांसाठी पुरेश्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री म्हणाले की, गड दत्तक घ्यायची माझी ऐपत नाही. पण गहिनीनाथ गडाने मला दत्तक घ्यावे. आपण सर्व मिळून गहिनीनाथ गडावर भाविकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा निर्माण करू. गडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करू.



मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. बीड जिल्ह्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ बघू देणार नाही. बीड जिल्हाला पाणीदार करणार. आष्टी तालुक्यापर्यंत पाणी आणले आहे. आता पुढे संपूर्ण बीड जिल्ह्यात पाण्याची सोय करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदावरीमध्ये आणण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. कृष्णा कोयनेचे पाणी गोदावरीपर्यंत आणणार. लवकरच किमान तीस टीएमसी पाण्याचे नियोजन करणार. पाण्यासाठी दोन जिल्ह्यांमध्ये संघर्ष होऊ नये याची खबरदारी घेणार. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळवून देणार; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Comments
Add Comment

Water Cut : पुण्यात सोमवारपासून २५ टक्के पाणीकपात

पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात

Konkan Railway : कोकण रेल्वे दुपदरीकरणासाठी तांत्रिक तपासणी सुरू

रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त

Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी

Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन दोन दिवस बंद राहणार

पंढरपूर : पंढरपुरचे विठ्ठल मंदिर २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मंदिर सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली