VI suffers outage : राज्यभरात व्हीआय नेटवर्कचा घोळ; युजर्सच्या हजारो तक्रारी! नेमकं कारण काय?

मुंबई : देशभरात नावाजलेली व्हीआय (Vodafone Idea) या प्रमुख दूरसंचार कंपनीने भारतात टप्प्याटप्प्याने 5G सेवा सुरू केली आहे. मात्र आज पहाटे व्हीआयच्या ग्राहकांना नेटवर्कचा (VI Network) मोठा सामना करावा लागला. मुंबई, पुणे, दिल्ली येथील व्हीआय सिम धारकांना मोबाईल इंटरनेट, कॉलिंग, ऑनलाईन पेमेंट अशा आवश्यक सेवा वापरताना अनेक अडचणी सहन कराव्या लागल्या. सकाळ सकाळीच होणाऱ्या या समस्यांमुळे वापरकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून नेटवर्कबाबत हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. (VI suffers outage)



नेमकं कारण काय?


शुक्रवारी पहाटे व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांना नेटवर्क खंडित झाल्याचा सामना करावा लागला, त्यामुळे दिल्ली एनसीआर, मुंबई आणि पुणे येथील वापरकर्त्यांना मोबाईल इंटरनेट वापरता येत नव्हते किंवा कॉल करता येत नव्हते. टेलिकॉम ऑपरेटरने तांत्रिक बिघाडामुळे हे व्यत्यय आल्याचे कंपनीने सांगितले. मात्र आता ही समस्या सोडवण्यात आली असून सर्व सेवा आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, युजर्सना झालेल्या समस्यांबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून वापरकर्त्यांचे संयम आणि समजूतदारपणाबद्दल आभार मानले आहेत.



वापरकर्त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ


डाउनडिटेक्टर आउटेज-ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मनुसार, रात्री १२ वाजून ३० मिनिटांनंतर तक्रारी वाढू लागल्या आणि सुमारे १ वाजेपर्यंत १ हजार ८८० हून अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या. अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आणि म्हटले की त्यांना वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळू शकले नाहीत, ज्यामुळे ऑनलाइन बँकिंगसारख्या आवश्यक सेवांवर परिणाम होत आहे. इतरांनी असे नोंदवले की त्यांचे डिव्हाइस रीस्टार्ट करून किंवा व्ही अ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करून समस्या सुटली नाही.

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ