Tamil Nadu Temple : मंदिरांना दान केलेलं सोनं वितळवून राज्य सरकार कमवतंय कोट्यवधी रुपये

तामिळनाडू : तामिळनाडूमधील मंदिरांना आता उत्पन्नाचा एक नवीन स्रोत मिळाला आहे. मंदिरांना दान केलेलं सोनं तामिळनाडू सरकार वितळवून त्याच्या सोन्याच्या पट्ट्या करुन घेत आहे. या पद्धतीने तामिळनाडू सरकारने आतापर्यंत २१ मंदिरांमधील सुमारे एक हजार ७४ किलो सोनं वितळवून २४ कॅरेट सोन्याच्या पट्ट्या (गोल्ड बार) तयार करुन घेतल्या आहेत. हे सोनं भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेत जमा केले जात आहे.



सोन्याच्या पट्ट्यांवर स्टेट बँकेकडून आतापर्यंत १८ कोटी रुपये व्याज देण्यात आले आहे. या पैशांचा वापर मंदिरांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, विकासाची कामं आणि मंदिरांची देखभाल यांसाठी केला जात असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. मुंबईतील टांकसाळीत सोनं वितळवून त्याच्या पट्ट्या तयार करण्याचे काम करण्यात आले. या पट्ट्या एका योजनेअंतर्गत (गोल्ड इन्व्हेस्टमेंट स्कीम) स्टेट बँकेत जमा करण्यात आल्या आहेत; अशी माहिती तामिळनाडू सरकारने दिली.



पट्ट्या तयार करण्यासाठी दान स्वरुपात मंदिरांना मिळालेल्या सोन्याचाच वापर केला आहे. हे सोनं वितळवण्याआधी ते मंदिरात वापरले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात आली आहे. जे सोने वापरात नव्हते तेच वितळवण्यात आल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. या कामासाठी सर्वात मोठे योगदान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील अरुलमिघू मरीअम्मन मंदिराचे होते. एकट्या मरियम्मन मंदिराने सुमारे ४२४ किलो सोने वितळवण्यासाठी दिले.



वितळवन्यासाठी मंदिराच्या सोन्याची निवड करणे आणि नंतर पट्ट्या तयार झाल्यावर त्या बँकेत जमा करणे ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याची माहिती तामिळनाडू सरकारने विधानसभेत दिली. या कामासाठी राज्य सरकारने तीन प्रादेशिक समित्या स्थापन केल्या आहेत. यातील प्रत्येक समितीचे अध्यक्ष हे निवृत्त न्यायाधीश आहेत.



सोन्याच्या योजनेला यश मिळत असल्याचे बघून तामिळनाडू सरकारने राज्यातील मंदिरांकडे दान म्हणून आलेली चांदी आणि चांदीचे दागिने हे वितळवण्याची योजना तयार करायला सुरुवात केली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीचे संकलन आणि ती वितळवण्याचे काम निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीतील समित्यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले जाणार आहे.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना