Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ओव्हरस्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, एक्सप्रेसवे किंवा बोगद्यात अनधिकृत पार्किंग, ओव्हरलोडिंग, सीट बेल्ट न लावणे, लेन अर्थात मार्गिकेचे उल्लंघन आदी चुका करणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड आकारला जाईल.



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर आणि इलेक्ट्रिकल केबल टाकत आहे. आतापर्यंत ५०० किमी. पेक्षा जास्त केबल डक्ट बसवण्यात आले आहेत. प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तसेच अपघात झाल्यास तातडीने मदत करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह कार्यक्षम टोल वसुलीची खात्री करणे हे आहे.



समृद्धी महामार्गावर एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी जुलै २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेड आणि अॅमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना काम देण्यात आले. प्रकल्प देखरेखीसाठी निप्पॉन कोई कंपनी लिमिटेड आणि निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती झाली.

ठाण्यातील इगतपुरी ते आमणे दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किलोमीटरचा भाग महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सुरू करण्याचे नियोजन आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. कसारा घाटाला बायपास केल्यामुळे आमणे आणि इगतपुरी दरम्यानचा प्रवास वेळ ९० मिनिटांवरून फक्त ४० मिनिटांवर येईल.

सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. मार्ग कार्यरत आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम झाल्यावर हा ७०१ किमी. चा महामार्ग नागपूर आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ १६ तासांवरुन आठ तासांवर आणेल.
Comments
Add Comment

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत उबाठा चुकीचा गैरसमज पसरवतंय - राहुल शेवाळे

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्रीकांत यांच्या खंडपीठाने १२ नोव्हेंबरची तारीख ही निकालासाठी दिलेली

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील