Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ओव्हरस्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, एक्सप्रेसवे किंवा बोगद्यात अनधिकृत पार्किंग, ओव्हरलोडिंग, सीट बेल्ट न लावणे, लेन अर्थात मार्गिकेचे उल्लंघन आदी चुका करणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड आकारला जाईल.



महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर आणि इलेक्ट्रिकल केबल टाकत आहे. आतापर्यंत ५०० किमी. पेक्षा जास्त केबल डक्ट बसवण्यात आले आहेत. प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तसेच अपघात झाल्यास तातडीने मदत करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह कार्यक्षम टोल वसुलीची खात्री करणे हे आहे.



समृद्धी महामार्गावर एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी जुलै २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेड आणि अॅमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना काम देण्यात आले. प्रकल्प देखरेखीसाठी निप्पॉन कोई कंपनी लिमिटेड आणि निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती झाली.

ठाण्यातील इगतपुरी ते आमणे दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किलोमीटरचा भाग महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सुरू करण्याचे नियोजन आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. कसारा घाटाला बायपास केल्यामुळे आमणे आणि इगतपुरी दरम्यानचा प्रवास वेळ ९० मिनिटांवरून फक्त ४० मिनिटांवर येईल.

सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. मार्ग कार्यरत आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम झाल्यावर हा ७०१ किमी. चा महामार्ग नागपूर आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ १६ तासांवरुन आठ तासांवर आणेल.
Comments
Add Comment

दादरमध्ये सलग चौथ्या दिवशी कारवाई जोरात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या फेरीवाल्यांविरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरु

मुंबईची खड्डेमुक्तीच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत ६३ टक्के सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची कामे पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘खड्डेमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी ध्येयाकडे वाटचाल करत मुंबई महानगरपालिकेच्या

पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ६०० कोटींचा प्रारूप आराखडा

मुंबई : राज्याच्या वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी माननीय

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन निधीत भरीव वाढ करण्याची पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ च्या राज्यस्तरीय बैठकीत सिंधुदुर्गातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांसमोर

वर्ल्ड क्लास मुंबईसाठी सर्वसमावेशक अ‍ॅक्शन प्लॅन

मुंबई : मुंबईला ड्रग्स-फ्री, झोपडपट्टीमुक्त व अतिक्रमणमुक्त करून जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकारने

अपात्र ठरलेल्या ९०० संस्थांवर विभागाची कारवाई; दिव्यांग क्षेत्रातील संस्थांसाठी नोंदणी बंधनकारक

मुंबई : राज्यात दिव्यांग व्यक्ती अधिनियम अंतर्गत दिव्यांगासाठी कार्यरत संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्त