RCB vs PBKS, IPL 2025: विराट विरुद्ध श्रेयस कोण बाजी मारणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): आयपीएल २०२५ आता बहरत चालली आहे, दिवसेंदिवस ह्या स्पर्धेत चुरस निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी कालचा सामना घेतला तर शेवटच्या षटकात ९ धावा हे काय २०-२० साठी अशक्य नाही परंतु तो सामना सूपर ओव्हर पर्यंत जाऊन पोचला. आज बेंगलोरच्या चेन्नास्वामी मैदानावर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स एकमेका समोर उभे ठाकणार आहेत.


दोन्ही संघ आयपीएल मध्ये आता पर्यंत सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने अगोदरच्या सामन्यात राजस्थानचा ९ गडी नी पराभव केला तर पंजाबने १११ धावा करून १६ धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळविला. चेना स्वामी स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.


आज आपल्याला विराट आणि श्रेयस यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. दोघेही सध्या आपापल्या संघासाठी फार सुंदर खेळताहेत. चेन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही हिटरसाठी प्रसिद्ध आहे. येथे बाउंड्री लाइन जवळ असल्यामुळे जास्त धावा होण्यास मदत होते. ह्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाणा सुरवातीला चांगला बाउंस मिळतो त्यामुळे झटपट विकेट घेण्याची संधी असते.


चला तर बघूया चेन्नास्वामी मैदानावर पंजाबचे शेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पराभवाचे पाणी पाजतात का?

Comments
Add Comment

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला