RCB vs PBKS, IPL 2025: विराट विरुद्ध श्रेयस कोण बाजी मारणार?

  99

मुंबई(ज्ञानेश सावंत): आयपीएल २०२५ आता बहरत चालली आहे, दिवसेंदिवस ह्या स्पर्धेत चुरस निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी कालचा सामना घेतला तर शेवटच्या षटकात ९ धावा हे काय २०-२० साठी अशक्य नाही परंतु तो सामना सूपर ओव्हर पर्यंत जाऊन पोचला. आज बेंगलोरच्या चेन्नास्वामी मैदानावर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स एकमेका समोर उभे ठाकणार आहेत.


दोन्ही संघ आयपीएल मध्ये आता पर्यंत सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने अगोदरच्या सामन्यात राजस्थानचा ९ गडी नी पराभव केला तर पंजाबने १११ धावा करून १६ धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळविला. चेना स्वामी स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.


आज आपल्याला विराट आणि श्रेयस यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. दोघेही सध्या आपापल्या संघासाठी फार सुंदर खेळताहेत. चेन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही हिटरसाठी प्रसिद्ध आहे. येथे बाउंड्री लाइन जवळ असल्यामुळे जास्त धावा होण्यास मदत होते. ह्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाणा सुरवातीला चांगला बाउंस मिळतो त्यामुळे झटपट विकेट घेण्याची संधी असते.


चला तर बघूया चेन्नास्वामी मैदानावर पंजाबचे शेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पराभवाचे पाणी पाजतात का?

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल