IPL Anniversary: १७ वर्षांची झाली आयपीएल लीग, पहिल्याच सामन्यात आले होते मॅकक्युलमचे वादळ

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)ची सुरूवात झाली होती. आयपीएलचा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला होता. बंगलोरच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकक्युलमचा जलवा पाहायला मिळाला होता.



मॅकक्युलमच्या वादळात आरसीबीची उडाली हवा


ब्रँडन मॅकक्युलम कोलकाता नाईट रायडर्ससाठी सलामीवीर म्हणून उतरला आणि त्याने धावांचा डोंगर रचला. त्याने केवळ ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद धुंवाधार खेळी केली. या दरम्यान त्याने १३ षटकार आणि १० चौकार फटकावले. मॅकक्युलमच्या या अविस्मरणीय खेळीच्या जोरावर सौरव गांगुलीच्या नेतृत्वातील केकेआरने तीन बाद २२२ धावा केल्या होत्या.


प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ १५.१ षटकांत केवळ ८२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळेस बंगलोरचे नेतृत्व राहुल द्रविड करत होता. राहुल द्रविड सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. मॅकक्युलमच्या ऐतिहासिक खेळीमुळे त्याला प्लेयर ऑफ दी मॅच निवडण्यात आले होते.


आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेते राजस्थान रॉयल्स ठरले होते. ऑस्ट्रेलियाचा महान स्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स चॅम्पियन बनले होते. तेव्हा राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सला ३ विकेटनी मात दिली होती. हा सामना १ जून २००८मध्ये झाला होता. त्या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करत होता.


आयपीएलचा पहिला हंगाम जबरदस्त ठरला होता. त्यानंतर टी-२० क्रिकेटमधील लोकांची रूची आणि आवड वाढत गेली.त्यामुळे आयपीएलला मोठी पसंती मिळत गेली. आयपीएल हा ललित मोदी यांचा विचार होता. आयपीएलमुळे प्रचंड पैसा बरसू लागला. आयपीएलमुळे बीसीसीआयच्या उत्पन्नात इतकी वाढ झाली की इतर बोर्डाच्या तुलनेत बीसीसीआयने अनेकांना मागे टाकले.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए