हिंदी राष्ट्रभाषा शिकली पाहिजे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली असून, केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषा सूत्रानुसार महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र या निर्णयाला मराठी भाषाप्रेमींसह विविध क्षेत्रांमधून तीव्र विरोध आहे.


शिक्षणामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याला विरोध होत असतानाच भाजपाचे नेते आणि राज्य सरकारमधील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदीसुद्धा लोकांना आली पाहिजे, त्यामुळे नव्या शिक्षण धोरणातून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठी ही आपली भाषा आहे. मातृभाषा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आपण प्रत्येकजण मराठी बोलतो. तसेच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य आहे. मात्र हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने तीसुद्धा लोकांना आली पाहिले.

Comments
Add Comment

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,