नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष पथके मार्केटमध्ये तपासणी करीत आहेत तसेच प्लास्टिकचा साठा वितरणासाठी वाहतुक करणा-या वाहनांवरही लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत.
अशा प्रकारच्या दोन प्रतिबंधात्मक धडक कारवाया लागोपाठ २ दिवस परिमंडळ २ च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांच्या वतीने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आल्या. यामध्ये महापे एमआयडीसी परिसरात दुचाकी वाहनावरून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा २० किलो साठा वाहून नेणा-या दुचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला व त्याच्याकडील प्लास्टिक जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
त्याचप्रमाणे याच परिमंडळ २ च्या पथकाने १८ एप्रिल रोजी ऐरोली टोल नाका येथे ६० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक दुचाकीवरून वाहतुक करणा-या व्यक्तीकडूनही ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली करून ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
याशिवाय १७ एप्रिलला कोपरखैरणे येथे सेक्टर १८ मधील रावराय जनरल स्टोअर्स यांचेकडून ५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर २० ऐरोली येथे महेंद्र प्रजापती यांचेकडूनही १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.
अशाप्रकारे परिमंडळ १ व परिमंडळ २ च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांमार्फत उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १७ व्यक्ती / व्यावसायिकांकडून ८५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून २८३ किलो ७०० ग्रॅम प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आलेला आहे.
तरी विशेषत्वाने एकल वापर प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी /कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज…
जम्मू-काश्मीरसह उत्तर भारत हादरले काबूल : अफगाणिस्तान-ताजीकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी (दि. १९) भूकंपाचे तीव्र धक्के…
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…