नवी मुंबईत २८३.७०० किलो प्लास्टिक जप्त

  32

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष पथके मार्केटमध्ये तपासणी करीत आहेत तसेच प्लास्टिकचा साठा वितरणासाठी वाहतुक करणा-या वाहनांवरही लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत.

अशा प्रकारच्या दोन प्रतिबंधात्मक धडक कारवाया लागोपाठ २ दिवस परिमंडळ २ च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांच्या वतीने उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आल्या. यामध्ये महापे एमआयडीसी परिसरात दुचाकी वाहनावरून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा २० किलो साठा वाहून नेणा-या दुचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला व त्याच्याकडील प्लास्टिक जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

त्याचप्रमाणे याच परिमंडळ २ च्या पथकाने १८ एप्रिल रोजी ऐरोली टोल नाका येथे ६० किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक दुचाकीवरून वाहतुक करणा-या व्यक्तीकडूनही ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली करून ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

याशिवाय १७ एप्रिलला कोपरखैरणे येथे सेक्टर १८ मधील रावराय जनरल स्टोअर्स यांचेकडून ५ किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर २० ऐरोली येथे महेंद्र प्रजापती यांचेकडूनही १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

अशाप्रकारे परिमंडळ १ व परिमंडळ २ च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांमार्फत उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात १७ व्यक्ती / व्यावसायिकांकडून ८५ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून २८३ किलो ७०० ग्रॅम प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आलेला आहे.

तरी विशेषत्वाने एकल वापर प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी /कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा