Riteish Deshmukh : रितेश देशमुखने केले चाहत्यांजवळ मदतीचे आवाहन; काय आहे प्रकरण जाणून घ्या

  73

मुंबई : अवघ्या जगाला वेड लावणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखची खास ओळख आहे. रितेशने आजपर्यंत मराठी हिंदी अशा दोनी माध्यमांतील सिनेसृष्टीसाठी काम केले आहे. लय भारी चित्रपटापासून ते वेड चित्रपटापर्यंत रितेशने चाहत्यांची मने जिंकली. आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी रितेशने त्याच्या चाहत्यांजवळ मदत मागितली आहे.



रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानंतर आता रितेशचा 'राजा शिवाजी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवाजीमहाराजांवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक लूक व्हायरल झाला होता त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रितेशने या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर आज रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्या मध्ये रितेश चाहत्यांजवळ मदत मागत आहे.





काय म्हणाला रितेश ?


"आम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहोत. त्या चित्रपटाचं नावं 'राजा शिवाजी' आहे. आम्ही या चित्रपटाचं टायटल लोगोच्या शोधात आहोत. आपल्यापैकी कोणी जर डिझाइनर असेल,कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील तर कृपया आपण या चित्रपटावर आपले डिझाइन तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर पाठवावे. ज्यांचं डिजाईन या चित्रपटासाठी निवडलं जाईल त्यांना आम्ही क्रेडिट देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिजाईन तयार करा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. दरम्यान तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन करणार लग्न

मुंबई : सनरायझर्स हैदराबादची मालकीण आणि प्रसिद्ध उद्योगपती काव्या मारन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चा

Video : कोस्टल रोडच्या बोगद्यात कार उलटली

मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात जोरदार पावसामुळे एक कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटल्याची घटना शुक्रवारी

मुंबईकरांनो रविवारी रेल्वे प्रवास करण्याआधी हे वाचा

मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि पनवेल ते

पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांवर २०० कॅमेरे ठेवणार नजर

मुंबई : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

मुंबई मेट्रो क्रमांक ९ मार्गिकेच्या कामाला वेग

दहिसर ते मीरा-भाईंदर मार्गाचे काम प्रगतिपथावर मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए)

कांदा धोरण ठरविण्यासाठी १९ सदस्यीय समितीची स्थापना

मुंबई : महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव,