Riteish Deshmukh : रितेश देशमुखने केले चाहत्यांजवळ मदतीचे आवाहन; काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई : अवघ्या जगाला वेड लावणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखची खास ओळख आहे. रितेशने आजपर्यंत मराठी हिंदी अशा दोनी माध्यमांतील सिनेसृष्टीसाठी काम केले आहे. लय भारी चित्रपटापासून ते वेड चित्रपटापर्यंत रितेशने चाहत्यांची मने जिंकली. आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी रितेशने त्याच्या चाहत्यांजवळ मदत मागितली आहे.



रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानंतर आता रितेशचा 'राजा शिवाजी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवाजीमहाराजांवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक लूक व्हायरल झाला होता त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रितेशने या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर आज रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्या मध्ये रितेश चाहत्यांजवळ मदत मागत आहे.





काय म्हणाला रितेश ?


"आम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहोत. त्या चित्रपटाचं नावं 'राजा शिवाजी' आहे. आम्ही या चित्रपटाचं टायटल लोगोच्या शोधात आहोत. आपल्यापैकी कोणी जर डिझाइनर असेल,कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील तर कृपया आपण या चित्रपटावर आपले डिझाइन तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर पाठवावे. ज्यांचं डिजाईन या चित्रपटासाठी निवडलं जाईल त्यांना आम्ही क्रेडिट देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिजाईन तयार करा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. दरम्यान तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक