Riteish Deshmukh : रितेश देशमुखने केले चाहत्यांजवळ मदतीचे आवाहन; काय आहे प्रकरण जाणून घ्या

मुंबई : अवघ्या जगाला वेड लावणारा अभिनेता म्हणून रितेश देशमुखची खास ओळख आहे. रितेशने आजपर्यंत मराठी हिंदी अशा दोनी माध्यमांतील सिनेसृष्टीसाठी काम केले आहे. लय भारी चित्रपटापासून ते वेड चित्रपटापर्यंत रितेशने चाहत्यांची मने जिंकली. आता रितेशचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तत्पूर्वी रितेशने त्याच्या चाहत्यांजवळ मदत मागितली आहे.



रितेश देशमुख हा नेहमीच चर्चेत असतो. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानंतर आता रितेशचा 'राजा शिवाजी' हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट शिवाजीमहाराजांवर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी रितेशचा एक लूक व्हायरल झाला होता त्यानंतर चर्चाना उधाण आले होते. फेब्रुवारी २०२४ मध्ये रितेशने या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर पोस्ट केले होते. त्यानंतर आज रितेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली आहे. ज्या मध्ये रितेश चाहत्यांजवळ मदत मागत आहे.





काय म्हणाला रितेश ?


"आम्ही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढत आहोत. त्या चित्रपटाचं नावं 'राजा शिवाजी' आहे. आम्ही या चित्रपटाचं टायटल लोगोच्या शोधात आहोत. आपल्यापैकी कोणी जर डिझाइनर असेल,कोणी कॅलिग्राफी आर्टिस्ट असतील तर कृपया आपण या चित्रपटावर आपले डिझाइन तयार करावेत आणि खाली दिलेल्या ईमेलच्या पत्त्यावर पाठवावे. ज्यांचं डिजाईन या चित्रपटासाठी निवडलं जाईल त्यांना आम्ही क्रेडिट देऊ. हा चित्रपट आपला स्वतःचा आहे असं समजून कृपया डिजाईन तयार करा" असं अभिनेता रितेश देशमुख म्हणाला. दरम्यान तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील